‘शून्य’वरून सुरू झालेला खेळ….आता तब्बल 10000 कोटींचा गेम! अनिल अंबानींचे जबरदस्त पुनरागमन

Published on -

Reliance Power:- आज शेअर बाजारात एक जुना ओळखीचा चेहरा पुन्हा उजळून निघालाय. कधी काळी देशातील श्रीमंतांच्या यादीत अग्रेसर असलेले अनिल अंबानी, गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्णपणे झाकोळले गेले होते. पण आता त्यांच्या दोन कंपन्यांनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स पॉवरने जोरदार पुनरागमन करत त्यांच्या भविष्याला नव्याने वळण दिलं आहे. बाजारातील हालचाली पाहता, या पुनरागमनाची सुरुवात केवळ आकड्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वासही हळूहळू परत येतोय.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने दिलेला दिलासा काय?

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने अलीकडेच मोठा कायदेशीर दिलासा मिळवला. कंपनीविरुद्ध दिवाळखोरी जाहीर करण्याचा जो आदेश NCLT ने दिला होता, त्याला NCLAT ने थांबवले आहे. हा निर्णय कंपनीसाठी निर्णायक ठरला, कारण त्यामुळे अनेक मोठे व्यवहार आणि सरकारी करार पुन्हा मार्गी लागू शकले. एवढंच नाही तर अंबानींच्या या कंपनीने ५,००० कोटी रुपयांचा संरक्षण क्षेत्रातील ‘फुल स्केल’ विमान प्रकल्प हाती घेतला आहे. खासगी क्षेत्रात अशा प्रकारचा प्रकल्प हाती घेणारी ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. या निर्णयामुळे कंपनीच्या भविष्यातील महसुलाला स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे.

रिलायन्स पॉवरनेही घेतली मुसंडी

दुसरीकडे, रिलायन्स पॉवरनेही मागे न राहता जोरदार मुसंडी मारली आहे. केवळ गेल्या महिन्यातच या कंपनीच्या शेअरमध्ये ६३ टक्क्यांची वाढ झाली. इतकी मोठी उसळी कंपनीने अनेक वर्षांनंतर पाहिली आहे. यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तिच्या उपकंपनीने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत केलेला दीर्घकालीन करार. तब्बल ९३० मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या या करारात बॅटरी स्टोरेजची क्षमता हीसुद्धा आशियातील सर्वांत मोठी मानली जाते. यासाठी १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे आणि यामुळे कंपनीची साखळी अधिक भक्कम होईल, असा विश्वास व्यक्त केला जातो.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनिल अंबानींची कहाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एकेकाळी अब्जाधीश, नंतर आर्थिक संकटात सापडलेले आणि आता पुन्हा मैदानात उतरत असलेले अंबानी हे अनेकांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. २०२० मध्ये त्यांनी लंडनच्या न्यायालयात ‘माझ्याकडे काहीही नाही’ असं जाहीर केलं होतं. पण केवळ चार-पाच वर्षांतच त्यांनी त्या परिस्थितीवर मात करून, नव्या संधी शोधून, आपल्या कंपन्यांना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe