बँकांच्या फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात का ? गुंतवणूकीआधी एकदा नक्कीच वाचा

Published on -

FD News : अलीकडे देशात शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. अनेक जण या रिस्की ठिकाणी गुंतवणूक करताना दिसतात. नवयुवक तरुण अधिक रिटर्न मिळत असल्याने शेअर मार्केटकडे वळत आहेत.

पण आजही जुनी पिढी सुरक्षित गुंतवणुकीलाच प्राधान्य देते. जुने लोक सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकांच्या एफडी योजनांमध्ये सर्वाधिक पैसा लावतात. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड पूर्णपणे जोखीमीचे आहे.

यामुळे लोक एफडी करतात पण एफडी मध्ये खरंच तुमचा पैसा पूर्णपणे सुरक्षित असतो का? हा सवाल अनेकांच्या मनात येतो. दरम्यान आता आपण फिक्स डिपॉझिट मध्ये केलेली गुंतवणूक खरंच सुरक्षित आहे का याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या लेखातून करणार आहोत.

FD सुद्धा सुरक्षित नाही 

गत काही वर्षात फिक्स डिपॉझिट करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक समावेश पाहायला मिळतो. कमी रिटर्न मिळाले तरी चालेल पण आपले पैसे पूर्णपणे सुरक्षित हवेत या हेतूने लोक एफडी करतात.

या वर्षात आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. यामुळे बँकांच्या एफडी योजनांचे व्याजदर सुद्धा कमी झाले आहे. याचा परिणाम म्हणून एफडी करणाऱ्यांची संख्या अलीकडील काही महिन्यांमध्ये कमी झाली आहे.

तरीही अनेकजण आजही एफडी च्या तयारीत आहे. थोडेफार व्याज कमी मिळेल पण आपला पैसा सुरक्षित राहील हा हेतू डोळ्यापुढे ठेवून लोक एफडी करतायेत.

पण फिक्स डिपॉझिट अर्थात मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांचे पैसे सुद्धा शंभर टक्के सुरक्षित नसतात. तुम्ही जर कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेत पाच लाखांपेक्षा कमी रक्कम एफडी म्हणून गुंतवली असेल तर तुमचे पैसे सुरक्षित असतील.

पण यापेक्षा जास्त रकमेची एफडी सुद्धा असुरक्षित आहे. एखादी बँक बुडाली किंवा दिवाळखोर झाली अथवा मग आरबीआय ने त्या बँकेचे लायसन्स रद्द केले तर अशा स्थितीत एफडी करणाऱ्यांचे पैसे सुद्धा बुडू शकतात.

बँक बुडाल्यानंतर फक्त पाच लाख रुपये परत मिळतात. यात तुमची सेविंग व करंट अकाउंट मधील रक्कम, मुदत ठेव योजनेतील पैसे यांचा समावेश असतो. बँक बुडाल्यानंतर सदर बँकेच्या ठेवीदारांना एका ठराविक रकमेपर्यंत संरक्षण दिले जाते.

ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंत संरक्षण मिळते. म्हणजे बँक बुडाल्यानंतर ठेवीदारांना जास्तीत जास्त पाच लाख रुपये परत मिळू शकतात.

डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ही आरबीआयच्या मालकीची उप कंपनी असून या कंपनीकडून ठेवीदारांना हे संरक्षण दिले जाते.

पण जर बँक बुडाली आणि त्यामध्ये एखाद्या ठेवीदाराचे पाच लाखापेक्षा जास्त पैसे असतील तर त्याला फक्त पाच लाख मिळतील त्यापेक्षा जास्तीचे पैसे बुडतील. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News