8th Pay Commission News : देशभरातील सरकारी नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिल्याची माहिती पुढे येत आहे. जर सगळं नियोजन ठरल्याप्रमाणे पार पडलं, तर 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोग लागू होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच 2026 च्या सुरुवातीपासूनच सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या वेतनात मोठा बदल दिसून येणार आहे.
पेन्शनधारकांसाठीही सुखद…
या वेतन आयोगामुळे सर्वसामान्य कर्मचारी वर्गाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल, असं म्हटलं जात आहे. आता पर्यंतची चर्चा पाहता, फिटमेंट फॅक्टर हा सध्याच्या 2.57 वरून 2.86 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या वाढीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावर होणार आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर, सध्याचं किमान वेतन ₹18,000 आहे, जे नवीन आयोगानंतर सुमारे ₹51,480 पर्यंत जाऊ शकतं. पेन्शनधारकांसाठीही ही बातमी सुखद आहे कारण सध्या मिळणाऱ्या ₹9,000 पेन्शनऐवजी सुमारे ₹25,740 इतका दर महिन्याचा आधार मिळू शकतो.

किती पगार वाढणार ?
याचे परिणाम वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळे असतील. लेव्हल 3 वर असलेल्या कर्मचाऱ्यांचा सध्याचा पगार ₹57,456 असून, तो थेट ₹74,845 पर्यंत वाढू शकतो. याचबरोबर लेव्हल 6 वर कार्यरत कर्मचाऱ्यांचा सध्याचा पगार ₹93,708 वरून सुमारे ₹1.2 लाखांपर्यंत जाऊ शकतो.
किती पेन्शन वाढणार ?
पेन्शनधारकांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर उदाहरणार्थ ग्रेड पे ₹2000 असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन सध्या सुमारे ₹13,000 आहे, ते नवीन फिटमेंट प्रमाणानुसार ₹24,960 ते ₹27,040 पर्यंत वाढू शकतं. आणि ज्यांचं पेन्शन सध्या ₹16,000 आहे, त्यांना आता ₹30,720 पर्यंतचा लाभ मिळू शकतो.
याचप्रमाणे ₹2800 ग्रेड पे असलेल्या कर्मचाऱ्यांची पेन्शन सध्याच्या ₹15,700 वरून जवळपास ₹30,140 पर्यंत जाऊ शकतं. जर सरकारने 2.28 चा फिटमेंट फॅक्टर स्वीकारला, तर हे पेन्शन ₹32,656 पर्यंत वाढू शकतं. लेव्हल 5 मधील पेन्शनधारकांना याचा चांगलाच फायदा होईल.
लेव्हल 6 आणि ₹4200 ग्रेड पेवर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सध्या मिळणाऱ्या ₹28,450 पेन्शनऐवजी आता ₹54,624 पर्यंत वाढ मिळू शकते. आणि जर सरकारने फिटमेंट फॅक्टर 2.28 प्रमाणे सुधारणा केल्या, तर ही रक्कम थेट ₹59,176 वर जाऊ शकते.
या सगळ्या घडामोडी केवळ आर्थिक सुधारणा नसून, अनेक वर्षे देशासाठी सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कष्टांना मिळणारा एक आदर आहे. बदलत्या जीवनमानाच्या गरजांनुसार वेतनात सुधारणा होणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच, नवीन वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना आता मोठ्या आशा आहेत. सरकारने जर वेळेत अंमलबजावणी केली, तर 2026 हे वर्ष लाखो कुटुंबांसाठी अधिक स्थैर्य घेऊन येईल, यात शंका नाही.