वाढतं वजन हा आजकालचा एक सामान्य पण गंभीर विषय बनला आहे. कुणीही आरशात पाहिलं आणि आपल्या शरीराच्या वाढलेल्या साईझकडे बोट ठेवलं की मनात एकच विचार येतो, कसं कमी करायचं हे वजन? डाएट, जिम, औषधं, महागड्या सल्लागारांकडे धाव घेऊनही काही लोकांना त्यातून फारसा फायदा होत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, की बाबा रामदेव यांनी असा एक घरगुती आणि सहज उपाय सांगितला आहे, ज्यामुळे वजन दररोज तब्बल 1 किलोपर्यंत कमी होऊ शकतं?

बाबा रामदेव म्हणतात की लठ्ठपणा ही फक्त सौंदर्याची समस्या नाही, तर अनेक आजारांची सुरुवातसुद्धा आहे. वाढलेलं वजन मधुमेह, उच्च रक्तदाब, सांधेदुखी यांसारख्या रोगांचं कारण बनतं. म्हणूनच, हे वेळेत कमी करणं गरजेचं आहे. काही लोक वजन कमी करण्यासाठी हजारो रुपये खर्च करतात, प्रथिने पावडर घेतात, पण शरीरात काहीच बदल दिसत नाही. त्याचवेळी जर तुम्ही थोडं संयम पाळून रामदेव बाबांनी सुचवलेला उपाय करून पाहिलात, तर नक्कीच फरक जाणवेल.
बाबा रामदेव यांचा उपाय
या उपायाचं एक उदाहरण त्यांनी स्वतः दिलं.राजस्थानमधील बिरबल नावाच्या एका मुलानं हाच उपाय वापरून अवघ्या काही दिवसांत 4 किलो वजन कमी केलं. हे ऐकून अनेक लोकांनी या पद्धतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.
या उपायामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे आहारातून काही गोष्टी पूर्णपणे वगळणं. जसं की मीठ, साखर, दूध, तूप आणि धान्य. हे ऐकायला कठीण वाटेल, पण काही दिवसांचाच संयम तुम्हाला खूप मोठा फरक दाखवू शकतो. जेव्हा हे पदार्थ आपण टाळतो, तेव्हा आपल्या शरीरात अतिरिक्त कॅलरी आणि कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण झपाट्यानं कमी होतं. परिणामी, शरीर आपल्या साठवलेल्या चरबीचा वापर ऊर्जा म्हणून करायला लागतं आणि हळूहळू वजन कमी व्हायला सुरुवात होते.
पण एवढंच नाही, तुमचा आहार संपूर्णपणे रिकामा न ठेवता, त्यात सॅलड, खरबूज, टरबूज आणि वाफवलेल्या भाज्यांचा समावेश करणं आवश्यक आहे. यामुळे शरीराला आवश्यक प्रथिने, पाणी आणि जीवनसत्त्वं मिळत राहतात, आणि अशक्तपणा जाणवत नाही. हा मार्ग थोडा कठीण वाटू शकतो, पण परिणाम पाहून तो निश्चितच प्रेरणादायी वाटेल.
म्हणूनच, जर तुम्हीही वजनावर कंट्रोल मिळवायचं ठरवलं असेल, आणि आहाराच्या बाबतीत थोडा संयम ठेवू शकत असाल, तर बाबा रामदेव यांचा हा उपाय एक नवा आशेचा किरण ठरू शकतो.