हल्ली वजन वाढल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना मधुमेह, हृदयविकार आणि सांधेदुखी यासारखे गंभीर आजार भेडसावत आहेत. अशा वेळी वेगवेगळे उपाय करून थकलेले लोक आता नैसर्गिक व पारंपरिक उपायांकडे वळू लागले आहेत. अशातच आयुर्वेदिक एंड हर्बलचे एमडी सुभाष गोयल यांनी सांगितलेला एक देसी फॉर्म्युला सोशल मीडियावर खूप गाजतो आहे आणि त्याचे परिणामही आशादायक असल्याचे सांगितले जाते.

सुभाष गोयल यांचा देसी फॉर्म्युला
सुभाष गोयल, जे वर्धन आयुर्वेदिक आणि हर्बलचे एमडी आहेत, त्यांनी एका पॉडकास्टमध्ये असे सांगितले की, शरीरातील अतिरिक्त चरबी वितळवण्यासाठी एक घरगुती रेसिपी तयार करता येते, जी पोट आणि मांडीवर जमा झालेल्या चरबीवर विशेषतः काम करते.
ही पावडर वजन कमी करण्यासाठी तयार केलेल्या इतर औषधांपेक्षा स्वस्त आणि नैसर्गिक आहे, असे ते म्हणतात. त्याचा उपयोग सातत्याने केल्यास केवळ 7 दिवसांत फरक जाणवतो, असाही दावा केला जातो.
‘अशी’ बनवा चमत्कारी पावडर
ही देसी पावडर बनवण्यासाठी काही विशिष्ट आयुर्वेदिक घटकांची आवश्यकता असते. त्यात वावडिंग, बहेडा, काळी मिरी, पिप्पली आणि सुकं आलं. या पाचही गोष्टी समान प्रमाणात घेऊन एकत्र वाटून बारीक पावडर तयार केली जाते. तयार झालेली ही औषधी पावडर रोज सकाळी आणि संध्याकाळी अर्धा चमचा घ्यायची असते. ही पावडर शरीरातील पचनक्रिया सुधारते, चरबी विरघळवण्याची प्रक्रिया गतिमान करते आणि सेल्युलाईट देखील कमी करते.
मात्र, केवळ ही पावडर घेतल्याने वजन कमी होईल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल. त्याचबरोबर आहारात योग्य बदल करणे, रोज थोडा व्यायाम करणे, पुरेसे पाणी पिणे आणि रात्री वेळेवर झोपणे आवश्यक आहे. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान किंवा श्वसनाचे काही सराव केल्यास वजन कमी करण्याची प्रक्रिया आणखी सोपी होते.