शनिवारचा दिवस आपल्या जीवनात बदल घडवू शकतो, असं ज्योतिषशास्त्र मानतं. विशेषतः जेव्हा आर्थिक तंगी, अपयश आणि मानसिक अशांतता सतावत असेल, तेव्हा शनिदेवांची कृपा लाभणे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. शनिवारी केलेले काही विशिष्ट उपाय तुम्हाला ना केवळ श्रीमंत बनवू शकतात, तर तुमच्या आयुष्यात सुख-शांती आणि स्थैर्यही घेऊन येऊ शकतात.

ज्यांच्या जन्मकुंडलीत शनिदोष असतो, त्यांना जीवनात वारंवार अडथळ्यांचा सामना करावा लागतो. व्यवसायात नुकसान, नोकरीत अस्थिरता, अचानक होणारे खर्च, आणि घरातील तणाव या सगळ्यांमागे शनीची अशुभ छाया असू शकते. पण शनिदेव हे केवळ दंड करणारे देव नाहीत योग्य भावनेनं, श्रद्धेने आणि नियमाने केल्यास ते कृपाही करतात. शनिवारी केलेले काही सोपे उपाय तुमच्या नशिबाचं चक्र बदलू शकतात.
पीठ आणि गूळाच्या पोळ्या
त्यापैकी एक उपाय म्हणजे सव्वा किलो गहू पीठ आणि सव्वा किलो गूळ एकत्र मिसळून त्या मिश्रणाच्या पोळ्या तयार करणे. या पोळ्या शनिवारी सूर्यास्तानंतर दूध देणाऱ्या गायीला खाऊ घालाव्यात. हा उपाय सलग सात शनिवार केला तर आयुष्यात आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतात. गायीला अन्न देणे म्हणजे प्रत्यक्षात दैवी शक्तीला अर्पण केल्यासारखे मानले जाते, जे शनिदेवांच्या कृपेसाठी महत्त्वाचे ठरते.
11 पीठाचे दिवे
दुसरा एक प्रभावी उपाय म्हणजे लक्ष्मीमातेसमोर 11 पीठाचे दिवे ठेवणे. या दिव्यांना सकाळ-संध्याकाळ प्रज्वलित करावे. 11 दिवस हा उपाय करून, शेवटच्या दिवशी 11 लहान मुलींना जेवण देणे, त्यांना पांढरा रुमाल, एक नाणं आणि मेंदी भेट म्हणून देणे यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात संपत्तीचं वास्तव्य टिकून राहतं.
वडाला हळदीची गाठ बांधणे
पैशाची कमतरता नष्ट करण्यासाठी एक खास उपाय म्हणजे सूर्योदयाच्या वेळी एखाद्या जुन्या वडाच्या झाडावर जाऊन त्याच्या मुळांमध्ये हळदीची गाठ बांधणे. काही दिवसांनी जेव्हा तुम्हाला आर्थिक लाभ मिळू लागेल, तेव्हा ती गाठ काढून ती आपल्या घरातील तिजोरीत ठेवावी. असे केल्याने तिजोरी नेहमी भरलेली राहते, असा विश्वास आहे.
शनिदेवांची पूजा करा
या सर्व उपायांसोबतच शनिदेवांची पूजा करणे सर्वात मूलभूत आणि प्रभावी मार्ग आहे. शनिवारी त्यांच्या समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्यात काळे तीळ टाकावेत. या दिव्याची ज्योत शनिदेवांसमोर पेटवली की त्यांच्या क्रोधाची तीव्रता कमी होते आणि त्यांचे आशीर्वाद सहज मिळतात.