घरात तुटलेल्या वस्तू ठेवताय? ही सवय तुम्हाला आर्थिक अडचणीत टाकू शकते! वाचा वास्तुशास्त्र काय सांगते?

Published on -

वास्तुशास्त्र हे केवळ घराच्या दिशांपुरते मर्यादित नाही, तर आपल्या दैनंदिन सवयींचाही जीवनावर मोठा प्रभाव टाकते. काही चुकीच्या सवयी आपल्या जीवनात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, ज्यामुळे आर्थिक अडचणी, मनःशांतीचा अभाव आणि प्रगतीत अडथळे निर्माण होतात. हे दोष दिसायला छोटे वाटले तरी त्यांच्या परिणामांचे स्वरूप मोठे असते. जाणून घेऊया अशाच काही सवयी ज्या वास्तुशास्त्रानुसार टाळणे आवश्यक आहे.

पैशांची उधळपट्टी

वास्तुशास्त्रानुसार, पैसा हा विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने खर्च केला पाहिजे. आवेगाने खरेदी करणे, सतत नको त्या वस्तूंमध्ये पैसे घालवणे, ही सवय आर्थिक अराजकता आणते. अशी सवय असलेल्या घरात लक्ष्मीदेवीचा वास राहत नाही, असेही मानले जाते. त्यामुळे खर्च करताना गरज आणि बजेट याचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे.

केस किंवा नखे कापणे

 

बऱ्याचदा आपले आजी-आजोबा आपल्याला रात्री केस किंवा नखे कापायला मनाई करतात, त्यामागेही वास्तुचा शास्त्रीय आधार असतो.

सूर्यास्तानंतर अशा कृती करणे अशुभ मानले गेले आहे. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि देवी लक्ष्मीचा अपमान होतो. विशेषतः गुरुवार व एकादशी या दिवशी ही कृती अजिबात करू नये.

स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवणे

जिथे स्वच्छता नसते, तिथे सकारात्मक ऊर्जा टिकत नाही. स्वयंपाकघर ही घराची लक्ष्मी मानली जाते, त्यामुळे त्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अस्वच्छता ही वास्तुदोष निर्माण करणारी सर्वात प्रमुख गोष्ट असून, ती घरात दरिद्रता आणते. दररोज घर झाडून-पुसून ठेवणे आणि स्वयंपाकघर आवरलेले असणे आवश्यक आहे.

तसेच, अनेकदा रात्री जेवणानंतर कंटाळवाणेपणामुळे भांडी सिंकमध्ये तशीच ठेवली जातात.

पण वास्तुशास्त्रात ही सवय अत्यंत अशुभ मानली गेली आहे. घाणेरडी भांडी रात्री ठेवणे म्हणजे नकारात्मक ऊर्जा घरात थांबवणे. तसेच गळणारे नळही धनहानीचे संकेत मानले जातात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News