2025 हे वर्ष भयानक संकटांचे असेल, अशी धक्कादायक भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली आहे.त्यांनी 2025 साठी जे भाकित केले आहे, ते वाचून अनेकांच्या मनात भीतीचे वादळ उसळले आहे. युद्ध, महामारी, नैसर्गिक आपत्ती आणि मानवतेचा अंत – ही केवळ कल्पना नाही, तर त्यांच्या म्हणण्यानुसार येणाऱ्या काळाची वास्तवता ठरू शकते.
बाबा वेंगा यांनी अनेकदा आपल्या अचूक भाकितांनी जगाचे लक्ष वेधले. मग ते 2004 ची त्सुनामी असो किंवा 2019-20 च्या कोविड महामारीबद्दलचा इशारा. या सगळ्या घटना त्यांच्या भविष्यवाणीनंतर खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळेच 2025 विषयी त्यांचे सांगणे गंभीरपणे घेतले जात आहे.

बाबा वेंगा यांची भविष्यवाणी-
त्यांच्या म्हणण्यानुसार, युरोपमध्ये 2025 च्या सुरुवातीस एक भयंकर युद्ध सुरू होईल. हे युद्ध इतके विनाशकारी असेल की, संपूर्ण खंडाच्या लोकसंख्येवर त्याचा खोल परिणाम होईल. हे युद्ध केवळ दोन राष्ट्रांपुरते मर्यादित राहणार नाही, तर ते हळूहळू तिसऱ्या महायुद्धाचे स्वरूप घेईल. आणि एकदा का जग तिसऱ्या महायुद्धाच्या विळख्यात अडकलं, तर त्यातून सुटणं जवळपास अशक्य होईल.
या काळात केवळ युद्धच नव्हे, तर भूकंप, दुष्काळ आणि हवामानातील विचित्र बदल देखील मानवजातीच्या नशिबाशी खेळतील. विशेषत: आशियातील जपान, म्यानमार आणि थायलंड यांसारख्या देशांमध्ये भूकंप आणि वादळं मोठ्या प्रमाणावर विनाश करतील. मार्च 2025 मध्ये म्यानमारमध्ये झालेला 7.7 तीव्रतेचा भूकंपही त्यांच्या भाकिताशी जोडला जातो.
बाबा वेंगांच्या मते, हे सर्व फक्त सुरुवात असेल. पुढच्या काही वर्षांत जग उपासमारीमुळे अडकून पडेल. 2028-29 च्या सुमारास इतका मोठा दुष्काळ पडेल की, जगभरातील शेतीसाठी आवश्यक पाणी आणि अन्नसाठा संपुष्टात येईल. लोक एकमेकांविरोधात उभे राहतील. संघर्ष एवढा वाढेल की, मानवतेचा अंत टाळता येणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
मानवजातीचा अंत…
त्यांनी स्पष्टपणे भाकीत केलं आहे की, मानवजातीचा अंत 5079 मध्ये होईल. पण त्याची सुरुवात 2025 पासूनच होईल. युद्ध, रोग, नैसर्गिक आपत्ती, सामाजिक संघर्ष – या सगळ्यामुळे मानवी जीवन अधिकाधिक त्रासदायक होईल आणि जग एका अंधकारमय काळाकडे झुकू लागेल. बाबा वेंगा यांच्या या भाकीताची आता पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे.