केस गळती फक्त हवामानामुळे नव्हे, तर कुंडलीतील ग्रहदोषानेही होतात! जाणून घ्या उपाय

Published on -

केस गळण्याचं कारण फक्त हवामान, ताण किंवा हार्मोनल बदल असतो असं आपण मानतो. पण खगोलशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर, तुमच्या कुंडलीतील काही ग्रह तुमचं सौंदर्य हिरावून घेत असतील, यावर विचार केलात का? केस गळणे ही फक्त शारीरिक नाही, तर खगोलशास्त्रीय समस्या देखील असू शकते. अनेकदा डॉक्टरांकडून उपचार करूनही फरक पडत नाही, आणि हे अस्वस्थ करणं सुरूच राहतं. अशावेळी तुमच्या पत्रिकेकडे एक नजर टाकणं उपयोगाचं ठरू शकतं.

राहू दोष

ज्योतिषशास्त्र सांगतं की काही विशिष्ट ग्रह जर कुंडलीत अशुभ अवस्थेत असतील, तर ते तुमच्या केसांवर थेट परिणाम करतात. त्यात राहू, केतू, सूर्य, शनी आणि बुध या ग्रहांचा उल्लेख विशेषतः होतो. राहू हा केसांचा प्रमुख कारक मानला जातो. जर राहू कुंडलीत नीच राशीत असेल किंवा धनु किंवा वृश्चिकसारख्या राशीत दुर्बल स्थितीत असेल, तर केस गळती सहजपणे वाढू शकते. राहूचा सूर्यावर दृष्टीपात असल्यास तर टक्कल पडण्याची शक्यता अधिक असते. मानसिक गोंधळ, अस्थिरता आणि अचानक वाढलेला ताण, हे सगळं राहूच्या असंतुलनामुळेच.

केतू दोष

केतू देखील दुर्लक्षित करता येणार नाही. त्याचा प्रभाव जर अशुभ असेल, तर केस गळतीसोबत टाळूची त्वचा खराब होऊ लागते. सूर्य जर सहाव्या किंवा आठव्या घरात असेल, किंवा त्यावर राहू-केतूचा प्रभाव असेल, तर केसांची चमक कमी होते आणि टक्कल पडण्याची प्रक्रिया लवकर सुरू होते.

शनी दोष

शनीची गोष्ट तर वेगळीच. जर शनी कुंडलीत कमजोर स्थितीत असेल, विशेषतः बाराव्या किंवा आठव्या घरात, तर केस कोरडे, निस्तेज आणि कमजोर होतात. शनीच्या अशुभ प्रभावामुळे केस अकाली पांढरे होतात, गळू लागतात आणि टाळूला सूज व खाज निर्माण होते.

बुध ग्रह दोष

बुध ग्रहाचा टाळूशी थेट संबंध आहे. जर बुध नीच राशीत असेल किंवा सहाव्या/आठव्या घरात असेल, तर टाळूच्या समस्या जसे डॅंड्रफ, खाज, फंगल इन्फेक्शन वाढू शकतात. त्यामुळे केसांचं आरोग्य पूर्णपणे बिघडतं.

जाणून घ्या उपाय

हे सगळं ऐकल्यावर प्रश्न पडतो मग उपाय काय? तर यासाठी खगोलशास्त्रात काही साधे पण प्रभावी उपाय सांगितले आहेत. केतूचा त्रास कमी करण्यासाठी मंगळवारी किंवा बुधवारी “ॐ श्रं श्रीं श्रौं सह केतवे नमः” किंवा “ॐ कें केतवे नमः” या मंत्राचा 108 वेळा जप करा. काळं-पांढरं ब्लँकेट, लिंबू किंवा आवळा दान करा. कुत्र्यांना भाकरी खाऊ घालणं आणि भगवान गणेशाची पूजा करणं हेही फायदेशीर ठरतं.

सूर्याच्या अशुभ प्रभावासाठी रोज सकाळी तांब्याच्या भांड्यातून सूर्यदेवाला पाणी अर्पण करणं लाभदायक आहे. सूर्य मजबूत करण्यासाठी माणिक रत्न धारण करावं, पण ते फक्त ज्योतिषाच्या सल्ल्यानंतरच. अनामिका बोटात तांब्याची अंगठी घातली तरी फायदा होतो.

शनी दोषसाठीचे उपाय

शनी शांत करण्यासाठी शनिवारचं महत्व सर्वांनाच ठाऊक आहे. “ॐ शं शनैश्चराय नमः” या मंत्राचा 108 वेळा जप करा, पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, आणि काळे तीळ दान करा. शिवाय, लहान मुलांचा सन्मान करा आणि व्यसनांपासून दूर राहा, यानेही शनीचा कोप कमी होतो.

खगोलशास्त्रात एक उपयुक्त आणि थोडं वेगळं साधन सांगितलं गेलं आहे. तुटलेले केस जमिनीत गाडून टाकावेत. असं केल्याने राहू-केतूचा प्रभाव सौम्य होतो, असं मानलं जातं. ओले केस कंगव्याने लगेच विचरू नयेत, कारण असं केल्याने राहूला ‘संताप’ येतो, आणि त्याचा परिणाम अधिकच खराब होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!