आज जगात अस्वस्थता, संशय आणि असुरक्षिततेचं वातावरण आहे. इराण आणि इस्रायलमधील वाढता संघर्ष, अमेरिका आणि इतर महाशक्तींची हस्तक्षेपक भूमिका हे सर्व पाहता तिसऱ्या महायुद्धाचा धोका केवळ कल्पनेत राहिलेला नाही, तर तो वास्तवात उतरण्याच्या मार्गावर आहे. आणि एकदा का हे युद्ध सुरू झालं, तर सुरुवातीच्या 48 तासांतच तुमचं आयुष्य पूर्णपणे उलथून टाकणारं आहे.
ताज्या अहवालांनुसार, तिसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभिक टप्प्यात काही अशा गोष्टी घडतील, ज्या थेट सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनावर गंभीर परिणाम करतील. घरात बसलेल्यांनाही या युद्धाचे परिणाम चुकणार नाहीत.

एआय आणि सायबर हल्ले
सर्वात आधी एआय आणि सायबर हल्ले हे तुमचं डिजिटल जग उध्वस्त करू शकतात. इंटरनेटचा वेग अति कमी होईल, सोशल मीडियावर बंदी येईल आणि खोट्या युद्धाच्या व्हिडिओमुळे भीतीचं वातावरण निर्माण होईल. तुमचं डिजिटल जग भयंकर गोंधळात अडकून जाईल.
अर्थव्यवस्थेला धक्का
युद्धामुळे अर्थव्यवस्थेला जबरदस्त धक्का बसेल. शेअर बाजारात कोसळती तेजी, डॉलरच्या दरात मोठी चढ-उतार आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये अचानक उडी हे सर्व घडणं अगदी शक्य आहे. डाळ, गहू, दूध यासारख्या वस्तू तुमच्या आवाक्याबाहेर जातील.
प्रवास कोलमडेल
प्रवासाची स्थिती तर पूर्णपणे कोलमडेल. विमान उड्डाणे रद्द होतील, रेल्वे सेवा अनिश्चित होईल. परदेशात अडकलेल्यांना मोठा त्रास सहन करावा लागेल. अनेकजण घरापासून दूरचं राहू शकतात, आणि सुरक्षिततेसाठी त्यांना बाहेर पडणं अशक्य होईल.
अन्न-धान्य किंमती वाढणार
घाबरलेल्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात वस्तूंची साठवणूक केली जाईल. दुकानदारांकडे लांबच लांब रांगा लागतील. युद्धजन्य स्थितीत रेशनिंग पुन्हा सुरू होईल. तांदूळ, साखर, तेल मर्यादित प्रमाणात मिळेल.
मोठ्या शहरांवर हल्ल्याची शक्यता जास्त असल्यामुळे, शहरवासीयांचा जीव टांगणीला लागलेला असेल. कोणत्याही क्षणी बॉम्ब किंवा ड्रोनचा हल्ला होईल या भीतीने लोक घरात बंद राहतील.
बेरोजगारी
जसे युद्ध पुढे जाईल, बेरोजगारीचे प्रमाण झपाट्याने वाढेल. कंपन्या बंद होतील, गुंतवणूकदार गप्प बसतील आणि मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोकऱ्या जातील. रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल.
सैन्यसुद्धा या टप्प्यावर सामान्य नागरिकांना सैनिकी सेवा करण्यास सांगू शकते. म्हणजेच, तुम्हालाच संरक्षणासाठी हत्यार उचलावं लागू शकतं. स्थानिक पातळीवर रस्ते, पूल, महत्त्वाचे ठिकाणं यांचं संरक्षण करण्यासाठी नागरिकांची नेमणूक होऊ शकते.
एकीकडे जगभर युतीची राजकारणं सुरू असतील. कोणता देश कुणाच्या बाजूने उभा आहे हे ठरवणं कठीण होईल. भारतासारख्या देशांसाठी हे फारच किचकट राजनैतिक समीकरण ठरेल.
जगणं होईल कठीण
सरकारकडून इंधन, अन्नधान्य, औषध यांसारख्या गोष्टींवर नियंत्रण आणलं जाईल. सर्वांपर्यंत पुरवठा होण्यासाठी सरकार काही विक्रीवर बंदी घालू शकते. त्यामुळे लोकांची खरेदीस्वातंत्र्य संपुष्टात येईल.
युद्ध एकदा थांबले तरी, त्याचे परिणाम दीर्घकाळ जाणवतील. अनेक देश गरीबीच्या गर्तेत जातील, सरकारं अस्थिर होतील आणि अनेक ठिकाणी कट्टरपंथ वाढू लागेल. सामान्य लोकांसाठी पुन्हा पूर्ववत जीवन जगणं कठीण होईल.