कुंडलीतील गुरु दोषामुळे लग्न लांबतंय, आर्थिक नुकसान होतंय? धारणा करा ‘हा’ चमत्कारी रत्न! नशीबच पालटेल

Published on -

कधी-कधी जीवनात सगळं काही करत असूनही यश मिळत नाही, अपयश हातात उरते, आणि कारण कळतच नाही. अनेक जण अशा परिस्थितीत थकून जातात. पण भारतीय ज्योतिषशास्त्रात यामागे अनेकदा ग्रहांची भूमिका असते, विशेषतः गुरु ग्रहाची. गुरु दोष हा अशा समस्यांमागील एक महत्त्वाचा कारण असतो. जर गुरु कमजोर झाला असेल, तर नोकरी, व्यवसाय, शिक्षण, विवाह किंवा संतानप्राप्ती यासारख्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांवर अडथळे येऊ लागतात. अशा वेळी काही खास उपाय आणि रत्नांचे महत्व खूप वाढते.

 

गुरु ग्रहाला ‘बृहस्पती’ या नावानेही ओळखले जाते. तो विद्या, विवाह, धार्मिकतेचा कारक ग्रह मानला जातो. जर हा ग्रह कुंडलीत अशुभ स्थितीत असेल, तर व्यक्तीचा आत्मविश्वास डळमळीत होतो, निर्णयांमध्ये चुका होतात, आणि नातेसंबंधांमध्ये गोंधळ निर्माण होतो. याच कारणामुळे अशा परिस्थितीत सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या उपायांकडे लोक वळतात. त्यातील एक उपाय म्हणजे योग्य रत्न धारण करणे.

“पुखराज” रत्न

ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते की, गुरु ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी “पुखराज” नावाचे रत्न अत्यंत प्रभावी मानले जाते. हे रत्न धारण केल्याने केवळ ग्रहाचा अशुभ प्रभाव कमी होत नाही, तर व्यक्तीच्या आयुष्यात एक नवा उत्साह, स्थैर्य आणि समृद्धी येऊ लागते. अनेक लोकांनी याच्या वापरामुळे वैवाहिक अडथळे दूर होऊन स्थिरतेचा अनुभव घेतला आहे. तसेच नोकरीतील अपयश दूर होऊन प्रगतीची वाट खुली झाल्याचे अनेक अनुभव सांगतात.

पण पुखराज घालण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे. हे रत्न स्वतःहून खरेदी करून घालणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अनुभवी ज्योतिषी किंवा पंडिताचा सल्ला घेणे अत्यावश्यक असते. त्यांच्या मार्गदर्शनानुसारच रत्नाची शुद्धता, वजन आणि धारण करण्याची वेळ ठरवावी.

रत्न धारण करण्याचा शुभ दिवस

गुरुवारचा दिवस पुखराज धारण करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो, कारण हा दिवस गुरु ग्रहाशी संबंधित आहे. पुखराज हे रत्न सोन्याच्या अंगठीत बसवून उजव्या हाताच्या तर्जनीत घालावे, असे सांगितले जाते. रत्न घालण्याआधी विशिष्ट विधी आणि मंत्रांनी त्याची शुद्धी करणेही आवश्यक असते. यामुळे रत्नाची ऊर्जा अधिक प्रभावी बनते.

एकदा योग्य प्रकारे पुखराज घातल्यावर व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात. काहींच्या बाबतीत विवाह लवकर ठरतो, तर काही जणांना संतानप्राप्तीचा आनंद मिळतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात स्थैर्य आणि बुद्धिमत्ता लाभते. यश आणि समाधानाची वाट आपोआप सुकर होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!