‘या’ जन्म तारखेच्या मुलींवर प्रेम करणं सोप्पं नाही, छोट्या-छोट्या गोष्टीवर असं भडकतात की..वैतागून जाल!

Published on -

काही व्यक्तींचा स्वभाव इतका प्रभावी असतो की त्यांच्या उपस्थितीनेच वातावरण बदलते. अशाच काही मुली असतात ज्या स्वभावाने थोड्या चिडचिड्या वाटतात, पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असतो एक अनोखा आकर्षण. अंकशास्त्रात मूलांक 7 असलेल्या मुलींबद्दल असेच काहीसे सांगितले जाते, त्या छोट्या गोष्टींवर रागावतात, पण त्यांच्या आत्मविश्वासाने आणि स्पष्ट स्वभावाने त्या आपल्या जोडीदाराच्या मनात कायमचं घर करून बसतात.

मूलांक 7

ज्या मुलींचा जन्म महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 7 मानला जातो. अंकशास्त्रानुसार, या अंकावर केतू ग्रहाचे अधिपत्य असते, आणि याचा प्रभाव त्यांच्या स्वभावावर खोलवर दिसून येतो. या मुली अत्यंत स्पष्टवक्त्या असतात. त्या काहीही मनात न ठेवता सरळ बोलतात. जरी त्यांच्या बोलण्यात कधी कधी कटुता असली, तरी त्यामागे कोणताही वैयक्तिक हेतू नसतो. त्या सत्यावर विश्वास ठेवतात आणि गोलगोल बोलणाऱ्यांपासून दूर राहतात.

या मुली मोठ्या गोष्टींना फारसं महत्त्व देत नाहीत, पण एखादी छोटीशी गोष्ट, एखादं वचन विसरणं, वेळेवर न पोहोचणं, किंवा कुठल्यातरी मुद्द्यावर दुर्लक्ष होणं यामुळे त्या अस्वस्थ होतात. त्यांच्या रागाला फारशी कारणं लागत नाहीत, पण त्यांचा राग टिकतही नाही. त्या क्षणभर भडकतात, पण लगेच मूळ स्वभावात परत येतात. त्यांचा आयुष्याबाबतचा दृष्टिकोन अत्यंत सुस्पष्ट आणि निर्भय असतो.

गुण आणि स्वभाव

आध्यात्मिकता हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. पूजा, ध्यानधारणा, समाजसेवा या गोष्टींमध्ये त्यांना विशेष रस असतो. त्या केवळ स्वतःपुरतं जगत नाहीत, तर समाजासाठी काहीतरी चांगलं करावं, अशी त्यांची नेहमीची भूमिका असते. गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करणे हे त्यांच्यासाठी अभिमानाचं नसून एक नैतिक कर्तव्य असतं.

प्रेमाच्या बाबतीत कशा असतात?

प्रेमाच्या बाबतीत या मुली खूप भाग्यवान असतात. त्यांचं व्यक्तिमत्त्व इतकं प्रभावी असतं की त्यांच्या जोडीदाराला त्या कायम खास वाटतात. त्यांच्यासोबतचा प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी त्यांच्या जोडीदाराने विचारपूर्वक योजना केलेली असते. रोज नवे छोटे आश्चर्य, लाड, आणि काळजी घेणं हे त्यांच्या नात्यात नियमित असतं.

मुळात 7 मूलांकाच्या मुली आत्ममग्न, संयमी, पण एकाच वेळी भावनिक आणि नात्यांमध्ये गुंतलेल्या असतात. त्यांचा राग हा त्यांच्या मनातल्या गोड भावनांचा एक भाग असतो. आणि म्हणूनच, जरी त्या रागवतात, तरी प्रेमात त्या एकदा मन जिंकून घेतल्या की आयुष्यभरासाठी आपल्या जोडीदाराच्या मनावर राज्य करतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!