भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याची चर्चा आहे. पाकिस्तानात महागाईचा एवढा कहर आहे की सामान्य गोष्टींचे दर ऐकून भारतीयांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. भारतात सहज मिळणाऱ्या मिठाईपासून ते स्वयंपाकघरातल्या दररोजच्या भाज्यांपर्यंत सर्वकाही पाकिस्तानात सोन्याच्या भावाने विकले जात आहे. विशेषतः भारतीय मिठाई सोनपापडी आणि भाज्यांचे दर ऐकून कुणालाही 440 व्होल्टचा झटका बसू शकतो.

भारतात साधारण 200 ते 220 रुपयांत सहज मिळणारी सोनपापडी पाकिस्तानात तब्बल 1,300 रुपयांना विकली जात आहे. इतक्या प्रचंड दरवाढीमुळे ती तिकडे एक प्रकारची ‘लक्झरी मिठाई’ झाली आहे. फक्त मिठाईच नाही, तर रोजच्या वापरातील भाज्यांचेही दर सामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.
पाकिस्तानमधील भाज्यांचे दर
सध्या पाकिस्तानात लसणाचा दर 700 रुपये प्रति किलो आहे. ही किंमत ऐकून भारतीय बाजारपेठेत 200 रुपये किलो मिळणाऱ्या लसणाशी तुलना केली, तर पाकिस्तानात लसूण जणू एखाद्या हिरेसारखा चैनीचा जिन्नस झाला आहे.
टोमॅटोही मागे नाहीत. भारतात 50 ते 60 रुपयांत मिळणारे टोमॅटो पाकिस्तानात 200 रुपये प्रति किलो विकले जात आहेत. ही तिप्पट किंमत मध्यमवर्गीयांसाठी खूप मोठा आर्थिक बोजा बनली आहे.
ज्या भाज्या लोक खाण्यास टाळतात, त्या देखील पाकिस्तानात महागड्या झाल्या आहेत. उदाहरणार्थ, टिंडा आणि वांगी यांचे दर 120 रुपये किलो आहेत. भारतात ह्याच भाज्या 30 ते 50 रुपयांच्या दरम्यान सहज मिळतात.
तरबी, म्हणजे अळू, जिचा उपयोग पारंपरिक पाककृतींसाठी केला जातो, ती सुद्धा पाकिस्तानात 240 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. आणि कारल्याचा तर कहरच म्हणावा लागेल. त्याचा दर सध्या 400 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे.
पाकिस्तानी सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल
या आकड्यांवरून स्पष्ट होते की, भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये अन्नधान्य, भाज्या आणि मिठाई अत्यंत महागड्या आहेत. भारतात अद्यापही या गोष्टी सामान्य लोकांच्या आवाक्यात आहेत, तर पाकिस्तानात रोजच्या जेवणाचीही चिंता वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
महागाईच्या या तुलनेवरून भारतातील ग्राहकांना निश्चितच दिलासा वाटावा अशी परिस्थिती आहे, कारण अजून तरी इथे रोजच्या गरजेच्या वस्तूंवर तितका आर्थिक भार नाही.