आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मधुमेह एक सामान्य झालेला आजार आहे, जे केवळ औषधांवर नाही तर आहार आणि सवयींवरही अवलंबून असते. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या स्वयंपाकघरात असलेला साधा लसूण या आजारावर चमत्कारिक फायदा देऊ शकते? विशेषतः जर दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसूणाच्या फक्त दोन पाकळ्या खाल्ल्या, तर त्याचे शरीरावर फार मोठे सकारात्मक परिणाम होतात.

लसूण खाण्याचे फायदे
लसूण हा भारतीय आहारात केवळ चव वाढवण्यासाठी नाही, तर त्याच्या आरोग्यदायी गुणधर्मांमुळेही वापरला जातो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी लसूण खूप फायदेशीर ठरतो कारण त्यात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याची नैसर्गिक क्षमता असते. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिले तर लसणामुळे शरीरातील ‘होमोसिस्टीन’ नावाचे अमिनो अॅसिड नियंत्रित राहते, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण स्थिर ठेवण्यास मदत होते.
फक्त मधुमेहावरच नव्हे तर लसूण हृदयाच्या आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कच्च्या लसणाच्या पाकळ्या चावून खाल्ल्यास रक्तवाहिन्यांमधील अडथळे कमी होतात, ज्यामुळे हृदयाला अधिक कार्यक्षमतेने काम करता येते. यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो, आणि संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण सुधारते.
रक्तदाबवर लसूण ठरतो प्रभावी उपाय
लसूण रक्तदाब कमी करण्यातही मोठी भूमिका बजावतो. अनेक संशोधनांमध्ये दिसून आले आहे की लसणातील सल्फरयुक्त घटक रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तसेच ते ‘एलडीएल’ म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही घटवतात, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फारच आवश्यक असते.
लसूणमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक आणि पोटॅशियमसारखे आवश्यक खनिज घटक आढळतात. याशिवाय लसणामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यात मदत करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.