हिंदू पंचांगातील चौथा महिना असलेला आषाढ मास अत्यंत पुण्यदायक मानला जातो. हा महिना विशेषतः भगवान विष्णूंना समर्पित आहे. यामध्ये नियम, संयम, उपासना आणि त्यागाला फार महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या महिन्यात देव विश्रांती घेतात, म्हणून काही गोष्टी करण्यास मनाई आहे, तर काही गोष्टी केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते. चला जाणून घेऊया आषाढ महिन्यात नेमकं काय करावं आणि काय टाळावं.
‘या’ गोष्टी कराव्यात

दररोज ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे मन:शांती मिळते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. विष्णूच्या उपासनेने पापांचे क्षालन होते आणि घरात सौख्य टिकून राहतं.
आषाढ महिन्यात दोन एकादशी येतात – देवशयनी आणि कामिका एकादशी. या दिवशी उपवास आणि विष्णू पूजन केल्याने भवसागरातून मुक्ती मिळते, असे मानले जाते.
तसेच या महिन्यात गूळ, मीठ, अन्नधान्य, तांबे-पितळेची भांडी, छत्री, कपडे, पाण्याचे पात्र इ. वस्तूंचे दान केल्यास विशेष पुण्य लाभते. गरजू व्यक्तींना मदत करण्याचा हा उत्तम काळ आहे.
या महिन्यात तुळशीला दररोज पाणी अर्पण करा. विशेषतः 108 पिवळ्या धाग्याच्या गाठी तुळशीला बांधल्यास विवाहातील अडथळे दूर होतात. यामुळे घरात धार्मिक वातावरण निर्माण होते.
‘या’ गोष्टी टाळाव्यात
आषाढ मासात मुंडन, गृहप्रवेश, विवाह इ. शुभ कार्य करणे निषिद्ध मानले जाते कारण हा काळ देवतांच्या निद्रास्थितीचा आहे. त्यामुळे यावेळी कोणतेही मांगलिक कार्य टाळावे.
या महिन्यात सात्विक भोजन करणे अधिक लाभदायक मानले जाते. त्यामुळे तामसी पदार्थ म्हणजे लसूण-कांदा किंवा शिळं अन्न खाणं वर्ज्य आहे. धार्मिक मान्यतेनुसार, आषाढ महिन्यात झाडांची तोडफोड केल्यास पाप लागते. निसर्गाशी सुसंवाद ठेवण्याचा हा काळ आहे.