4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्यांच्या नात्यात का येतात समस्या?, नातेसंबंध टिकवण्यासाठी वाचा ज्योतिषीय उपाय!

Published on -

अंकशास्त्रानुसार प्रत्येक अंक व्यक्तीचा स्वभाव, नशिब आणि नातेसंबंधांवर प्रभाव टाकतो. त्यात 4 क्रमांकाचे लोक, म्हणजेच 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले, हे विशेष गुणधर्म घेऊन येतात. त्यांच्यावर राहूचा प्रभाव असल्यामुळे त्यांचा स्वभाव वेगळा आणि कधीकधी हट्टी असतो, जो त्यांच्या नातेसंबंधांवर थेट परिणाम करतो.

मूलांक 4

4 क्रमांकाचे लोक स्वातंत्र्यप्रिय असतात. त्यांना त्यांच्या जीवनशैलीवर कोणतेही बंधन नको असते. जोडीदाराने स्वातंत्र्यावर मर्यादा आणल्या की ते बंडखोर बनतात. यामुळे नात्यात तणाव, भांडणं आणि ब्रेकअपची वेळ येऊ शकते. राहूच्या प्रभावामुळे त्यांचा मूड पटकन बदलतो. कधी खूप प्रेमळ तर कधी रागीट. या स्वभावामुळे नात्यात गैरसमज निर्माण होतात.

 

अंकशास्त्र सांगते की 13 तारखेला जन्मलेल्या 4 क्रमांकाच्या लोकांवर भूतकाळातील कर्मांचे कर्ज असते. या कर्म कर्जामुळे नातेसंबंधात विश्वासाचा अभाव, वारंवार ताणतणाव आणि दूरावा येऊ शकतो.

जाणून घ्या उपाय

4 क्रमांकाच्या लोकांना समजून घेण्यासाठी संयम हा महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करा, त्यांच्या भावना व्यक्त करण्यास प्रोत्साहित करा. राहूचा प्रभाव कमी करण्यासाठी “ॐ राम राहवे नमः” हा मंत्र जपावा किंवा शनिवारी हनुमान चालीसा वाचावी. याशिवाय, दोघांनी मिळून दानधर्म केल्यास नात्यात सकारात्मक ऊर्जा वाढते.

 

4 क्रमांकाच्या लोकांचे 1 (रवि), 5 (बुध) आणि 7 (केतू) क्रमांकाच्या लोकांशी उत्तम संबंध राहतात. हे लोक त्यांच्या स्वभावाचा आदर करून नात्यात स्थिरता आणतात. परंतु 2 (चंद्र) आणि 8 (शनि) क्रमांकाच्या लोकांशी नाते टिकवण्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!