पुरीच्या जगन्नाथ मंदिराशी निगडित अनेक परंपरा आणि रहस्ये आजही भक्तांच्या मनात गूढ आहेत. त्यापैकी एक परंपरा म्हणजे एकादशीच्या दिवशी भात खाल्ला जातो. एकीकडे हिंदू धर्मात एकादशी उपवासाचा दिवस मानला जातो, ज्या दिवशी भात खाणे वर्ज्य असते, तर दुसरीकडे जगन्नाथ मंदिरात मात्र याच दिवशी भक्तांना महाप्रसाद म्हणून भात दिला जातो. ही परंपरा कुठून सुरू झाली, यामागील गोष्ट खरोखरच विलक्षण आहे.

जाणून घ्या पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, एकदा ब्रह्माजींना भगवान जगन्नाथाच्या महाप्रसादाची तीव्र इच्छा झाली. ते पुरीच्या मंदिरात पोहोचले, पण तिथे महाप्रसाद संपलेला होता. प्रसादाच्या शोधात ते मंदिरात फिरत असताना त्यांना एक ताट सापडले ज्यामध्ये काही तांदळाचे दाणे होते आणि एक कुत्रा ते खात होता.
ब्रह्माजींची भक्ती इतकी तीव्र होती की त्यांनी त्या ताटातच कुत्र्यासोबत भात खाणे सुरू केले. योगायोगाने तो दिवस एकादशी होता. तेव्हा एकादशी माता प्रकट झाली आणि ब्रह्माजींवर हसत म्हणाली की, “आज एकादशी असूनही तुम्ही भात खात आहात.” हे दृश्य पाहून भगवान जगन्नाथ स्वतः प्रकट झाले.
त्यांनी ब्रह्माजींच्या निःस्वार्थ भक्तीने प्रसन्न होऊन घोषणा केली की, “आजपासून माझ्या महाप्रसादावर कोणतेही नियम लागू होणार नाहीत. एकादशीला देखील महाप्रसाद म्हणून भात दिला जाईल.”
…म्हणून जगन्नाथ पुरीमध्ये मिळतो भाताचा महाप्रसाद
त्याच क्षणी भगवान विष्णूने एकादशी मातेवर राग व्यक्त केला आणि असा विश्वास आहे की तिचा महाप्रसादाचा विरोध पाहता तिला शिक्षा म्हणून उलटे लटकवण्यात आले. म्हणूनच असे मानले जाते की आजही जगन्नाथ मंदिराच्या मागच्या बाजूला एकादशी माता उलटी लटकलेली आहे, जी केवळ पौराणिक आख्यायिका आहे की प्रत्यक्ष दृश्य, यावर आजही लोकांमध्ये चर्चा होते. या घटनेनंतर जगन्नाथ पुरीमध्ये एकादशीला महाप्रसादात भात देण्याची परंपरा सुरू झाली आणि आजही ती श्रद्धेने पाळली जाते.