त्या मुद्द्यावरून पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी विरोधकांना लगावला टोला ! म्हणाले कि,जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मी पाहणार…

Published on -

२७ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : एखाद्या विषयाबद्दल स्वतःच प्रतिकूल मत असलं तरी पीठासीन अधिकारी म्हणून पीठासीन अधिकाऱ्यांनी मर्यादा पाळली पाहिजे,असे सूचनात्मक वक्तव्य विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांच्या मर्सिडीज भाष्य प्रकरणावर केले.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्याचे विभाजन होणार नाही असे सांगितले आहे व त्यावर आपले मत व्यक्त करताना प्रा. शिंदे म्हणाले,कि ते त्यांचे मत असू शकते पण जिल्ह्याच्या विभाजनाबद्दल सभागृहात विषय निघाल्यावर त्या चर्चेला कशी कलाटणी देता येईल हे जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मी पाहनार आहे अशी सूचनात्मक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

विधान परिषदेचे सभापती पद स्वीकारल्यानंतर प्रथमच प्रा. शिंदे यांनी नगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्यावेळी भाजपचे प्रदेश पदाधिकारी प्रा. भानुदास बेरड, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर सरचिटणीस सचिन पारखी उपस्थित होते.यावेळी बोलत असताना प्रा. शिंदे म्हणाले कि, मी विधान परिषदेचा सभापती असल्यामुळे आणि ते पद संविधानिक असल्यामुळे माझे मत व्यक्त करण्यावर मर्यादा आहेत असे त्यांनी सांगितले.

म्हणून त्यांनी मढी ग्रामस्थ मुस्लिम व्यावसायिक बंदी ठराव आणि नगरचा बिहार झाल्याच्या खा. लंके यांच्या दाव्यावर मत व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला.
तीन मार्च पासून सुरू होणाऱ्या बजेट अधिवेशनात सभापती म्हणून प्रत्यक्ष कामाचा अनुभव मी घेणार आहे, असे स्पष्ट करून आमदारांच्या अपात्रते प्रकरणी सुनावणी झाली आहे व त्यांना वेळ वाढवून दिला गेला आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

चौंडीची राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषणा व्हावी

३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्म वर्ष सोहळा होणार आहे.त्यासाठी शिंदेनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. या पार्श्वभूमीवर चोंडी येथे मंत्रिमंडळ बैठक घ्यावी व चौंडी गाव राष्ट्रीय स्मारक जाहीर करून त्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सुविधा तिथे व्हाव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिंदे यांनी केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीसाठी त्यांनी तत्वतः मान्यता दिली आहे व राष्ट्रीय स्मारक करण्याच्या दृष्टीने चोंडी विकासाचा बृहत आराखडा तयार करून त्याबाबत बैठक घेण्याच्या सूचनाही संबंधित विभागाला केल्या आहे असे प्रा. शिंदे यांनी सांगितले.

रोहित पवारांचे आव्हानावर मौन

कर्जत-जामखेड या मतदार संघातुन मी पराभूत झाल्यावर तेथील आ. रोहित पवार यांनी ईव्हीएम व अन्य मुद्यांवर मोर्चा काढला होता.त्यावेळी मी त्यांना आव्हान दिले होते की मी पण आमदार आहे व तुम्ही पण आमदार आहात, आपण दोघांनीही राजीनामा देऊ आणि पुन्हा लढू असे त्यांना जाहीरपणे सांगितले होते,परंतु त्यावर त्यांनी मौनच पाळले आहे व नंतर ईव्हीएम मोर्चा सारखे त्यांचे प्रकारसुद्धा बंद झाले,असे मत मांडून प्रा. शिंदे म्हणाले, नगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अतिशय चांगली झाली पण पवारांनी विद्रोही संमेलनासारखी नवी विद्रोही कुस्ती स्पर्धा जाहीर केली आहे, परंतु ज्यांनी निवडणुकीत नुरा कुस्ती केली, त्यांनी खऱ्या कुस्ती स्पर्धेची भाषा करू नये असे वक्तव्यही प्रा. शिंदे यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe