ज्यांनी आरडाओरडा केला, ते मंदिरे उघडल्यानंतर अजूनही मंदिरात गेले नाहीत !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीने जाेरदार मुसंडी मारली.

आघाडीच्या तीन चाकांच्या सरकारला एक जनतेचे चाक जोडले गेले असल्याने आमची गाडी सुसाट सुरू आहे. त्यामुळे भाजपचे सत्तेचे स्वप्न साकार होणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ‌ यांनी केले.

मंदिरे खुली करण्यासाठी ज्यांनी आरडाओरडा केला, ते मंदिरे उघडल्यानंतर अजूनही मंदिरात गेले नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाराष्ट्रातील मंदिरे बंद होती.

ज्यांनी मंदिरे खुली करण्यासाठी आरडाओरडा केला ते लोक मंदिर उघडल्यानंतर मंदिरात अजूनही गेली नाहीत, असा टोला भाजपच्या नेत्यांना नाव न घेता भुजबळ यांनी लगावला. राजकारणाच्या वेळी राजकारण नक्की करा, असा सबुरीचा सल्ला भाजप नेत्यांना दिला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe