7th Pay Commission DA Hike : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. एस.टी. महामंडळ (MSRTC) कर्मचाऱ्यांच्या हिताचा एक मोठा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महागाई भत्त्यात चक्क 7 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळातील कार्यरत कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

काय आहे निर्णय?
एसटी कर्मचाऱ्यांना सध्या 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. पण आता हा भत्ता थेट 53 टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे यात 7% वाढ होईल, यामुळे त्यांचा पगार वाढणार आहे.
हा DA वाढीचा निर्णय कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, वाढलेला भत्ता चालू महिन्याच्या म्हणजे जून 2025 च्या पगारात समाविष्ट करण्यात येणार असे सुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच, या डी.ए. वाढीची अंमलबजावणी जानेवारी 2025 पासून करण्यात येणार असून, निधीच्या उपलब्धतेनुसार मागील महिन्यांची थकबाकी देण्याबाबत स्वतंत्र निर्णय घेतला जाणार अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
फडणवीस सरकारने घेतलेला हा निर्णय नक्कीच एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक राहणार आहे. गेल्या अनेक महिन्यापासून एस.टी. महामंडळातील कर्मचारी वर्गाचा DA वाढवण्याची मागणी केली जात होती, आता अखेरकार ही मागणी पूर्ण झाली आहे.
साहजिकच हजारो कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार असून, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह मानला जात आहे. कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच महामंडळ कर्मचाऱ्यांनाही वेळोवेळी महागाई भत्त्यात सुधारणा मिळावी यासाठी कर्मचारी संघटना मागणी करत होत्या आणि अखेर,
सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दाखवत DA वाढीला मंजुरी दिली आहे, यामुळे कर्मचारी वर्गामध्ये मोठे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.