Ahilyanagar News : अहिल्या नगर जिल्ह्यातील एसटी प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ते म्हणजे जिल्ह्यातील एसटी प्रवाशांसाठी एक नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांना मध्यप्रदेश ला जाणे सोयीचे होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथून मध्य प्रदेश साठी एक नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
काल 29 मे 2025 रोजी जामखेड तालुक्यातील चोंडी येथून ही नवीन बस सेवा सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, आता आपण याच नवीन बससेवेच्या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कशी असणार नवीन बससेवा ?
चोंडी ते इंदोर एसटी बस सेवा 29 मे पासून सुरू करण्यात आली आहे. खरे तर तीन-चार वर्षांपूर्वी ही बस सेवा सुरू होती मात्र कारणास्तव ही बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असे. पण कालपासून गेली तीन-चार वर्षे बंद असलेली चोंडी ते इंदोर एसटी बस सेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शरद पवार गटाचे नेते पांडुरंग माने यांनी ही बस सेवा पुन्हा सुरू व्हावी यासाठी पाठपुरावा केला होता.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते पांडुरंग माने यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता यश मिळाले आहे. काल, सकाळी पाच वाजता जामखेड बस स्थानकातून या बसने आपली सेवा पुन्हा सुरू केली आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती दिनाच्या आधीच प्रवाशांना मोठी भेट
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जामखेड तालुक्यातील चोंडी हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव आहे आणि इंदोर हे होळकर यांची कर्मभूमी. दरम्यान, आता होळकर यांच्या जन्म गावापासून ते कर्मभूमी इंदोरपर्यंतची ही बससेवा जामखेड तालुक्यातील प्रवाशांसाठी फायद्याचे राहणार आहे.
खरेतर, होळकर यांची त्रिशताब्दी जयंती 31 मे 2025 रोजी साजरी होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर ही बससेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी उपस्थित करण्यात आली होती.
पांडुरंग माने यांनी कर्जत जामखेड चे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य परिवहन महामंडळाकडे ही बससेवा पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी जोरदार पाठपुरावा केला होता.
दरम्यान आता हा पाठपुरावा यशस्वी झाला असून कालपासून ही बस सेवा सुरू झाली आहे. यामुळे तालुक्यातील प्रवाशांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.