Best Engineering Branch : सीबीएसई बोर्डाकडून तसेच महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. इतरही शिक्षण मंडळांनी गेल्या महिन्यात दहावी आणि बारावीच्या बोर्डाचा निकाल जाहीर केला आहे.
निकाल जाहीर झाला असल्याने आता विद्यार्थी पुढील वर्गात प्रवेशासाठी लगबग करत आहेत. बारावी उत्तीर्ण विद्यार्थी पदवीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत आहेत. बारावी विज्ञान मधून उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी आता अभियांत्रिकीला प्रवेश घेण्याच्या तयारीत आहेत.

अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुद्धा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान जर तुम्हालाही इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण एका लोकप्रिय इंजीनियरिंग ब्रांचची माहिती जाणून घेणार आहोत.
खरंतर बारावी सायन्स मधून उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी मेकॅनिकल केमिकल सिव्हिल अशा शाखेत ऍडमिशन घेतात. पण आज आपण अशा एका इंजीनियरिंग अभ्यासक्रमाची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामधून विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केल्यास त्यांना चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी लागणार आहे.
आज आपण कम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग बाबत माहिती पाहणार आहोत. कम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात नोकरी मिळवू शकतात या संदर्भात आज आपण आढावा घेऊयात.
कम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग पूर्ण केल्यानंतर या क्षेत्रात करिअर करता येणार
नेटवर्क इंजिनियर : कम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग पूर्ण केल्यानंतर नेटवर्क इंजिनियर म्हणून नोकरी मिळू शकते. या पोस्टवर नोकरी मिळाल्यास विद्यार्थ्यांना पाच ते दहा लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळू शकते. महत्त्वाचे म्हणजे अनुभव आल्यानंतर पगार आणखी वाढणार आहे.
सायबर सुरक्षा विश्लेषक : अलीकडे सायबर सुरक्षा महत्त्वाची बनली आहे. यामुळे अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये सायबर सुरक्षा विश्लेषकाची गरज भासत आहे. परिणामी जर तुम्ही कम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग पूर्ण केली तर तुम्हाला सायबर सुरक्षा विश्लेषक म्हणून काम करता येणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला वार्षिक सहा ते बारा लाखांचे पॅकेज मिळू शकते. अनुभव वाढल्यानंतर हे पॅकेज वीस लाखांपर्यंत जाऊ शकते.
AI इंजिनीयर : अलीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हे क्षेत्र जलद गतीने विस्तारत आहे. यामुळे एआय इंजिनिअरची मागणी वाढली आहे. कम्प्युटर सायन्स मधून इंजिनिअरिंग पूर्ण करून तुम्ही या पदासाठी पात्र ठरू शकता.
या सिस्टम डेव्हलपमेंट अँड डिझाईन यासाठी एआय इंजिनियरची गरज असते. म्हणून हा कोर्स तुमच्या करिअरला एक नवीन दिशा देऊ शकतो. हा कोर्स कम्प्लिट केल्यानंतर दहा ते वीस लाख रुपये पॅकेजची नोकरी लागू शकते.
सॉफ्टवेअर डेव्हलपर : आयटी कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर ची गरज असते. सॉफ्टवेअर डेव्हलपर होण्यासाठी तुम्हाला कम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग चे शिक्षण घ्यावे लागणार आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपर्सला भारतात 6 ते 12 लाख रुपये पॅकेजची नोकरी मिळते.
डेटा सायंटिस्ट : कम्प्युटर सायन्स मधून पदवी प्राप्त केल्यानंतर डेटा सायंटिस्ट म्हणून तुम्ही तुमचे करिअर बनवू शकता. डेटा सायंटिस्टला भारतात सध्या 8 ते 15 लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळते. मात्र अनुभव जर वाढला तर हे पॅकेज 25 लाखांपर्यंत जाऊ शकते.