Career Tips : दहावी बारावीचा निकाल जाहीर होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. बारावीचा निकाल गेल्या महिन्याच्या पाच तारखेला आणि दहावीचा निकाल 13 तारखेला जाहीर करण्यात आला. दहावी आणि बारावीचा रिझल्ट जाहीर झाला असल्याने आता विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी तयारी करत आहे.
तसेच दहावी बारावीनंतर आता पुढे काय करायचे हा मोठा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जातोय. यामुळे आज आपण अशा एका डिप्लोमाची माहिती जाणून घेणार आहोत, जो कम्प्लीट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी कमी वेळेत मिळू शकणार आहे. हा कोर्स विद्यार्थ्यांच्या करिअरला एक नवीन दिशा देणारा ठरणार आहे.

कोणता आहे हा डिप्लोमा ?
आम्ही ज्या डिप्लोमा बाबत बोलत आहोत तो आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन डिप्लोमा. हा एक तीन वर्षांचा पदवीका अभ्यासक्रम आहे. हा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन क्षेत्रातील मूलभूत आणि व्यावहारिक ज्ञान मिळत असते.
जाणकार लोक सांगतात की, आजचे हे युग संगणकाचे युग आहे. आजच्या काळात मोबाईल फोन, कॉम्प्युटर, इंटरनेट, विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणं मोठ्या प्रमाणात वापरली जातात आणि या सगळ्यांचा पाया इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये आहे.
यामुळे या क्षेत्रातील स्किल्ड लोकांना नेहमीच मागणी असते आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना चांगला पगार सुद्धा मिळतो. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन डिप्लोमा कंप्लिट केल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळते. हा डिप्लोमा पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळते.
म्हणजेच हा डिप्लोमा कंप्लिट झाल्यानंतर विद्यार्थ्यांची लाईफ सेट होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा कंप्लिट केल्यानंतर नोकरी करायची नसेल ते या अभ्यासक्रमात घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू करू शकतात.
या कंपन्यांमध्ये नोकरीं मिळणार
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकिया, सॅमसंग, ॲपल सारख्या मोठ्या कंपन्यामध्ये कामाची संधी उपलब्ध होऊ शकते. अलीकडेच एप्पल सारख्या कंपन्यांनी भारतात फॅक्टरी उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान कंपन्यांना त्यांच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीसाठी, टेस्टिंगसाठी आणि देखभालीसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गरज भासत असते. त्यामुळे जर तुम्हाला दहावी-बारावी नंतर लवकरात लवकर तुमचे करिअर सेट करायचे असेल तर तुम्ही हा डिप्लोमा करू शकता.