ण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! पुण्यातून 60 नवीन लोकल गाड्या सुरू होणार, रेल्वेचा मेगाप्लॅन काय सांगतो?

Published on -

Pune Railway News : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुणेकरांसाठी अधिक दिलासादायक आणि आनंदाची राहणार आहे. खरे तर रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून विविध प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

केंद्रातील शासनाने देशभरातील रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अमृत भारत स्टेशन ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. दरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच एक मोठी घोषणा केली आहे.

रेल्वेमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे पुणे रेल्वे स्थानकाचा लवकरच मोठ्या प्रमाणावर कायापालट होणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी सहा नवीन फलाटांची उभारणी तसेच 60 नव्या रेल्वे गाड्यांची भर पडणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे स्थानकावरील वाढती गर्दी कमी होणार असून, पुणेकरांचा रेल्वे प्रवास अधिक सुलभ, वेगवान आणि आरामदायी होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वे स्थानकाच्या सर्वांगीण विकासासाठी एक सविस्तर मास्टर प्लॅन तयार केला आहे. या योजनेअंतर्गत सध्याच्या फलाटांची लांबी वाढवण्यात येणार असून, त्यासोबत सहा नव्या फलाटांची उभारणी केली जाणार आहे. यामुळे पुणे स्थानकाची प्रवासी हाताळण्याची क्षमता जवळपास दुप्पट होणार आहे.

सध्या पीक अवर्समध्ये प्रवाशांना होणारा त्रास या विकासामुळे मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सध्या पुणे स्थानकावरून सुमारे 50 ओरिजनेटिंग रेल्वे गाड्या धावतात. मात्र पुढील पाच वर्षांत ही संख्या तब्बल 60 ने वाढवून एकूण 110 गाड्यांपर्यंत नेण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे.

याशिवाय पुण्याहून धावणाऱ्या 75 रेल्वे गाड्यांना 198 अतिरिक्त डबे जोडले जाणार आहेत. त्यामुळे सुमारे 20 हजार अतिरिक्त प्रवाशांची सोय उपलब्ध होणार आहे. नव्या 60 गाड्यांमुळे जवळपास दीड लाख प्रवाशांना थेट लाभ होणार असून, वेटिंग तिकिटांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होईल.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील प्रमुख 48 रेल्वे स्थानकांची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर या स्थानकांचा समावेश आहे. मात्र पुणे रेल्वे स्थानक परिसरात जागेची मर्यादा असल्याने, दोन सॅटेलाइट रेल्वे स्थानके विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच आळंदी, उरुळी आणि फुरसुंगी येथे मेगा कोचिंग टर्मिनल उभारले जाणार आहेत. या मास्टर प्लॅनमुळे पुणे शहरासह परिसरातील इतर रेल्वे स्थानकांवरही पुढील पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात सुविधा वाढणार आहेत. गाड्या आणि डब्यांची संख्या वाढल्याने प्रवाशांची गैरसोय कमी होणार असून, पुणेकरांचा रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News