बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर ‘या’ सरकारी नोकरीसाठी तयारी करा ! 100% लाईफ सेट होणार

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरी करण्याच्या तयारीत असाल तर आज आम्ही तुम्हाला बारावीनंतर कोणत्या सरकारी नोकरीसाठी अप्लाय करता येऊ शकते या संदर्भातील सविस्तर माहिती सांगणार आहोत.

Published on -

Maharashtra Educational News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. बारावीचा निकाल 5 मे 2025 रोजी लागला असून विद्यार्थी आता पुढील प्रवेशासाठी लगबग करत आहेत. अनेक जण बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर लगेचच नोकरीसाठी तयारी करतायेत.

दरम्यान, जर तुम्हालाही बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरीसाठी तयारी करायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरेतर 12 वी चा टप्पा विद्यार्थ्यांसाठी फारच महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आपल्या करिअरवर फोकस करतात.

खरंतर, हा टप्पा पार केल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर अनेक करिअरच्या वाटा खुल्या होतात. विद्यार्थ्यांपुढे बारावीनंतर अनेक ऑप्शन्स असतात आणि त्यातीलच एक महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे सरकारी नोकरी, कारण हा एक प्रतिष्ठेचा आणि सुरक्षित पर्याय मानला जातो. दरम्यान आज आपण बारावीनंतर संरक्षण क्षेत्रातील कोण-कोणत्या सरकारी नोकरीसाठी तयारी केली जाऊ शकते.

बारावीनंतर ‘या’ सरकारी नोकरीसाठी तयारी केली जाऊ शकते 

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) : आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ही संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची प्रवेश परीक्षा आहे. ही परीक्षा UPSC मार्फत घेतली जाते, तसेच ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते.

मात्र हवाई दल आणि नौदलासाठी PCM म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ या तीन विषयांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. लष्करासाठी कोणत्याही विषयासह उत्तीर्ण झालेले उमेदवार पात्र राहतात. यासाठी किमान साडेसहा वर्ष आणि कमाल 19.5 वर्ष उमेदवार पात्र राहतात.

यासाठीची निवड लेखी परीक्षा, SSB मुलाखत आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे होते. दरम्यान एनडीएचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दरमहा 56 हजार 100 रुपयांपर्यंत पगार दिला जातो.

भारतीय सैन्य : भारतीय सैन्यात सैनिक आणि तांत्रिक पदांसाठी अर्ज भरता येऊ शकतो. दरम्यान भारतीय सैन्यात सैनिक आणि तांत्रिक पदांसाठी अर्ज करायचा असेल तर या भरतीसाठी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण उमेदवारा अर्ज करू शकता.

यासाठी किमान साडे सतरा आणि कमाल 23 वर्ष वयाची उमेदवार पात्र राहतात. ही भरती प्रक्रिया शारीरिक, वैद्यकीय आणि (काही पदांसाठी) लेखी परीक्षेच्या माध्यमातून होत असते. 

भारतीय नौदल आणि हवाई दल : बारावीनंतर भारतीय नौदलात आणि हवाई दलात सुद्धा सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होते. पण नौदलात आर्टिफिसर अप्रेंटिससाठी PCM म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स सह 12 उत्तीर्ण आवश्यक आहे.

आणि यासाठी वयोमर्यादा 17 ते 21 वर्षे एवढी ठरवण्यात आली आहे. हवाई दलात गट ‘X’ साठी PCM आवश्यक आहे तर ‘Y’ गटासाठी कोणत्याही विषयासह बारावी उत्तीर्ण उमेदवार पात्र राहतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News