मुंबई, नागपूर सोबतच समृद्धी महामार्गावरून ‘या’ 25 महत्वाच्या ठिकाणी जाता येणार !

मुंबई आणि नागपूर या दोन कॅपिटल शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग आता पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. पण या महामार्गामुळे फक्त मुंबई आणि नागपूर ही दोनच शहर जोडली जाणार आहेत का ? नाही, तर या प्रकल्पामुळे राज्यातील 25 महत्वाची शहरें जोडली जाणार आहेत.

Published on -

Maharashtra Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच, अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरूच आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या रस्ते विकासाच्या प्रकल्पाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. राज्याला 701 किलोमीटर लांबीच्या एका महत्त्वाच्या महामार्गाची भेट मिळाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या 76 किमी टप्प्याचे उद्घाटन केले. आम्ही आपणास सांगू इच्छितो की डिसेंबर 2022 मध्ये या महामार्गाचा पहिला टप्पा सुरू झाला होता.

याच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले. या महामार्गाचा पहिला टप्पा हा नागपूर ते शिर्डी असा 520 किलोमीटर लांबीचा आहे. यानंतर याच्या दुसऱ्या टप्प्याचे म्हणजेच शिर्डी ते भरवीर या 80 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे 2023 मध्ये उद्घाटन झाले.

2024 मध्ये भरवीर ते इगतपुरी या पंचवीस किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन झाले. आणि आता मे 2025 मध्ये या महामार्गाचा शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे उद्घाटन झाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले आणि या सोहळ्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि अन्य मंत्रीगण सुद्धा उपस्थित होते. या टप्प्याच्या उद्घाटनानंतर हा मार्ग पूर्ण क्षमतेने सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे म्हणजेच समृद्धी महामार्गाचा संपूर्ण 701 किमीचा प्रवास आता वाहनचालकांसाठी खुला राहणार आहे.

मुंबई – नागपूर प्रवास फक्त आठ तासात

हा महामार्ग मुंबई आणि नागपूर या दोन महानगरांना थेट जोडतो. या महामार्गामुळे महाराष्ट्रातील 22हुन अधिक जिल्हे जोडले गेले आहेत. दरम्यान आता संपूर्ण मार्ग खुला झाल्यामुळे मुंबई ते नागपूरचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.

मुंबई नागपूर हा सोळा तासांचा प्रवास या नव्या मार्गामुळे केवळ आठ तासांत पूर्ण होणार आहे. या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार असून ठाणे, नाशिक व मराठवाड्यातील जिल्ह्यांमधून शेतमालाची वाहतूक अधिक सुलभ होणार अशी माहिती तज्ञांकडून देण्यात आली आहे.

फक्त मुंबई, नागपूर नाही तर या 25 ठिकाणी जाता येणार

खरे तर, या महामार्गावर एकूण 25 इंटरचेंज पॉइंट्स तयार करण्यात आले असून, प्रवाशांना विविध जिल्ह्यांतून इंट्री आणि एक्झिट ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हणजेच या महामार्गावरून राज्याच्या 25 महत्त्वाच्या ठिकाणी थेट जाता येणार आहे.

नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक आणि ठाणे अशा विविध जिल्ह्यांतून या मार्गावर सहज प्रवेश मिळणार आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील एकात्मिक विकासाला मिळणार आहे.

समृद्धी महामार्ग केवळ प्रवास सुलभ करत नाही तर तो महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला गती देणारा महत्त्वाचा दुवा ठरणार असे मत अनेक जानकारांकडून व्यक्त होत आहे. या महामार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होणार असून सुरक्षित प्रवास, वेळेची बचत आणि उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार अशी आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe