Maharashtra Expressway : सध्या केंद्रीय विधिमंडळाचे अर्थातच संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. लवकरच राज्याचे देखील हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचे वेळापत्रक सुद्धा रोल आउट करण्यात आले आहे. दरम्यान सद्यस्थितीला केंद्रीय विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.
या हिवाळी अधिवेशनातुन आज महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या प्रलंबित कामांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

तसेच या प्रकल्पांची कामे कधीपर्यंत पूर्ण होणारी या संदर्भातही त्यांनी सविस्तर माहिती सभागृहाला दिली. तसेच यावेळी त्यांनी राज्यातील एक महत्त्वाचा चार पदरी महामार्ग लवकरच सहा पदरी होणार अशी घोषणा आपण केली.
अशा स्थितीत आज आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केंद्रीय विधिमंडळात नेमके काय सांगितले याचा आढावा या लेखातून घेणार आहोत.
या तीन मार्गांचे काम लवकरच होणार पूर्ण
शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे–सातारा–कोल्हापूर मार्गाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सदर मार्गावरील काही टप्प्यांवर झालेल्या विलंबाबाबत सांगितले की पुणे–सातारा या भागाचे काम रिलायन्सकडून काढून घेण्यात आले आहे.
तसेच विभागाने या मार्गाच्या कामासाठी आता नव्याने आढावा सुरू केला आहे. खंबाटकी घाटातील नव्या बोगद्यांपैकी एकाचे काम लवकरच सुरू होणार असून पुढील आठवड्यात याबाबत उच्चस्तरीय बैठक आयोजित झाली आहे.
विशेष म्हणजे हा संपूर्ण मार्ग पुढील बारा महिन्यांच्या काळात पूर्णतः तयार होईल आणि या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायक होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
याशिवाय ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबई गोवा महामार्गाबाबत प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना एप्रिल 2026 पर्यंत हा मार्ग पूर्णपणे तयार होईल, असे गडकरींनी सांगितले. हा प्रकल्प 2009 मध्ये सुरू झाला.
या कालावधीत अनेक कंत्राटदार बदलले, जमीन अधिग्रहणात अडचणी आल्या, तसेच तांत्रिक कारणांमुळे कामांत विलंब झाला. तरीसुद्धा आतापर्यंत 89 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि शिल्लक भागाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे एप्रिल 2026 पर्यंत महामार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध करणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या खासदार शोबाबच्छाव यांनी आपल्या मतदारसंघातील धुळे – पिंपळगाव राष्ट्रीय महामार्गाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना गडकरी यांनी मार्गाचे तिसरे नूतनीकरण जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
तसेच या कामाची अधिकृत अंतिम मुदत एप्रिल 2026 आहे. म्हणजेच या मार्गाचे काम मुदतपूर्व होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. विशेष बाब म्हणजे हा चार पदरी महामार्ग येत्या काळात सहा पदरी होणार आहेत.
याबाबतचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाला असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे. नक्कीच हा मार्ग सहा पदरी करण्यात आला तर या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.













