Maharashtra New Bus Station : महाराष्ट्रात रेल्वे प्रमाणेच लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील खूपच उल्लेखनीय आहे. लाल परीने म्हणजेच एसटी महामंडळाच्या बसेसने तुम्हीही प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी महत्त्वाची ठरणार आहे.
खरंतर एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी शासनाच्या माध्यमातून अनेक मोठमोठे निर्णय घेतले जात आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी नवनवीन बसेस महामंडळाच्या ताफ्यात सामील होत आहेत.

सोबतच नवनवीन बसस्थानक देखील तयार केले जात आहेत आणि सध्याच्या अस्तित्वात बस स्थानकाचा पुनर्विकास सुद्धा होतोय. अशातच गेल्या अडीच दशकांपासून प्रतीक्षात असणाऱ्या महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या शहराला बसस्थानकाची भेट मिळाली आहे.
गेल्यावर्षी अर्थातच 2024 मध्ये जालना जिल्ह्यातील बदनापूर शहराला नवीन रेल्वे स्थानकाची भेट मिळाली आहे. 25 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर जालना जिल्ह्यातील या तालुक्याच्या ठिकाणी बसस्थानक तयार झाले आहे.
नवीन बस स्थानकामुळे बदनापूर शहरातून ये – जा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार अशी आशा होती मात्र बसस्थानक तयार झाल्यानंतरही येथील प्रवाशांचे हाल काही कमी झालेले नाहीत. भाजप आमदार नारायण कुचे यांच्या प्रयत्नातून गेल्या वर्षी हे बसस्थानक साकार झाले.
पण, अनेक एस.टी. बसेस बसस्थानकात न थांबता थेट महामार्गावरून निघून जातात, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो अशी माहिती येथील नागरिकांकडून देण्यात आली आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की जालना आगाराच्या सर्व बसेसला बदनापूरच्या जुन्या थांब्यासह नव्या बसस्थानकात थांबण्याचे आदेश असूनही, काही चालक मनमानी करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
येथील नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी 7:15 ची जालना सिडको बस ही जुन्या थांब्यावर थांबत नाही. परिणामी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोये आणि हेच कारण आहे की या प्रकरणात संबंधितांनी लवकरात लवकर योग्य ती कारवाई केली पाहिजे अशी मागणी उपस्थित करण्यात आलीये.
दुसरीकडे या बसस्थानकात केवळ एक वाहतूक नियंत्रक असून, तो सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंतच कार्यरत असतो. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो अशी सुद्धा तक्रार येथील नागरिकांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून वरिष्ठांना पत्रव्यवहार सुरू असून, बसचालकांच्या मनमानीवर कारवाई केली जाईल, असा गंभीर इशारा यावेळी दिलेला आहे. त्यामुळे आता या भागातील नागरिकांची अडचण सोडवण्यात प्रशासनाला यश येतं का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.