महाराष्ट्राला मिळणार 10 पदरी महामार्ग ! राज्यातील ‘ह्या’ दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या 6 पदरी महामार्गाचे 10 पदरी महामार्गात रूपांतर

राज्याला आणखी एका नव्या महामार्ग प्रकल्पाची भेट मिळणार आहे. महाराष्ट्रात एक दहा पदरी महामार्ग तयार होणार असून याच संदर्भात आज आपण डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

Maharashtra New Expressway : महाराष्ट्राला लवकरच एका दहा पदरी महामार्गाची भेट मिळणार आहे. खरे तर समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा नुकताच सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने या शेवटच्या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच संपन्न झाले असून यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास वेगवान होणार आहे.

या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास अवघ्या आठ तासात आणि मुंबई ते नाशिक हा प्रवास अवघ्या अडीच तासात संपन्न होईल अशी आशा आहे. दुसरीकडे मुंबई ते पुणे हा प्रवास वेगवान व्हावा या अनुषंगाने राज्याला लवकरच दहा पदरी महामार्गाची भेट मिळणार असून सध्याचा मुंबई-पुणे दरम्यान सहा पदरी महामार्ग दहा पदरी मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला गेला असल्याची बातमी समोर आली आहे.

काय आहेत डिटेल्स?

मुंबई आणि पुणे ही महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरे आहेत. या दोन्ही शहरा दरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या उल्लेखनीय आहे. हा भारतातील सर्वात व्यस्त महामार्गांपैकी एक आहे.

दरम्यान, या व्यस्त महामार्गावर सतत वाढणारी रहदारी कमी करण्याच्या प्रयत्नात, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने 6 पदरी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचे दहा पदरी एक्सप्रेस वे मध्ये रूपांतरण करण्याचा मोठा निर्णय घेतलेला असून याबाबतचा प्रस्ताव तयार झाला असल्याची माहिती समोर येतेय.

यामुळे भविष्यात मुंबई ते पुणे हा प्रवास सुपरफास्ट होणार असून वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. खरे तर मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा 96 किलोमीटर लांबीचा महामार्ग असून यावर दररोज 65000 हून अधिक वाहने प्रवास करतात. जेव्हा शनिवार आणि रविवार असतो तेव्हा ही संख्या आणखी वाढते यात शंकाच नाही.

महामार्ग विस्ताराची योजना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सादर 

राज्य रस्ते विकास महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी पुष्टी केली आहे की, नुकत्याच झालेल्या पावसाळ्यातील तयारीच्या पुनरावलोकन बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर योजना सादर करण्यात आली आहे.

तसेच या विस्ताराचे उद्दीष्ट भविष्यातील वाहतुकीच्या मागण्यांची पूर्तता करणे आणि गर्दी कमी करणे आहे, असे सुद्धा पाटील यांनी नमूद केले. सध्या मुंबई आणि पुणे दरम्यानच्या प्रवासास सामान्य परिस्थितीत सुमारे दोन तास लागतात.

मात्र शनिवारी आणि रविवारी प्रवासासाठी अधिक वेळ लागतो. मात्र या महामार्गाचे विस्तारीकरण पूर्ण झाले तर प्रवासाचा कालावधी गर्दीच्या काळातही कमीच राहणार आहे. मुंबई पुणे प्रवास यामुळे सुपरफास्ट होणार आहे.

दरम्यान या प्रकल्पासाठी जवळपास 15000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या या प्रकल्पासाठीचे वित्तीय मॉडेलिंग चालू आहे. मात्र मीडिया रिपोर्ट्स मध्ये हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजेच सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर पूर्ण केला जाऊ शकतो असा दावा केला जातोय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe