महाराष्ट्राला मिळणार 47 किलोमीटर लांबीचा नवा रेल्वे मार्ग ! राज्यातील ‘या’ नव्या रेल्वे प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला केंद्र सरकारची मंजुरी

राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण होणार आहे. यामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे.

Published on -

Maharashtra New Railway : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच उल्लेखनीय आहे, देशातील रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. तसेच, देशात एकूण साडेसात हजार रेल्वे स्थानक आहेत.

दुसरीकडे रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे कडून रेल्वेचे जाळे आणखी वाढवले जात आहे. महाराष्ट्रासहीत संपूर्ण देशभरात नवनवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात आहेत.

तसेच सध्या जे रेल्वे मार्ग अस्तित्वात आहेत त्यांची क्षमता वाढवण्यासाठी रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण, तिहेरीकरण आणि चौपदरीकरण केले जात आहे.

अशातच, आता महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील एका 47 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला मंजुरी मिळाली आहे.

या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला मिळाली मान्यता 

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातील मिरज ते कोल्हापूर यादरम्यानच्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण केले जाणार असून याच्या सर्वेक्षणासाठी केंद्रातील सरकारकडून नुकतीच मान्यता देण्यात आली आहे.

केंद्रातील सरकारकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मिरज ते कोल्हापूर यादरम्यानच्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण केले जाणार असून यामुळे मिरज ते कोल्हापूर हा प्रवास वेगवान होणार आहे. या निर्णयामुळे कोल्हापुरातून अनेक नवीन रेल्वे गाड्या सुरू होणार अशी माहिती जाणकारांकडून मिळत आहे.

खरंतर या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व्हावे यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता आणि आता महाडिक यांचा पाठपुरावा यशस्वी झाला असे आपण म्हणू शकतो. म्हणूनच रेल्वे प्रवासी संघटनांच्या माध्यमातून खासदार धनंजय महाडिक यांच अभिनंदन केले जात आहे.

दरम्यान, खासदार धनंजय महाडिक यांनी या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्वेक्षणास मंजुरी मिळाली असल्याने लवकरच या मार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामाला सुरुवात होईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे.

मिरज ते कोल्हापूर यादरम्यानच्या रेल्वे मार्गाचे जर दुपदरीकरण झाले तर कोल्हापुरातून अनेक रेल्वे गाड्या सुरू होणार आहेत. कोल्हापुरातून आणखी नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुद्धा सुरू होऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News