महाराष्ट्रातील ‘या’ शहरात येणार नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल उद्योग ! मुख्यमंत्र्यांचे संकेत, राज्यातील कोणते शहर बनणार ईव्ही हब ?

महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात वेगवेगळ्या इंडस्ट्रीजचे क्लस्टर तयार होतील. मुख्यमंत्री फडणवीस यांनीच असे संकेत दिले आहेत. यानुसार नाशिकमध्ये डिफेन्स क्लस्टर तर पुण्यात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजचे क्लस्टर आणि महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर ऑटोमोबाईल हब म्हणून विकसित होईल अशी शक्यता आहे.

Published on -

Maharashtra News : राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी राज्यातील प्रत्येक विभागात वेगवेगळ्या इंडस्ट्रीजचे क्लस्टर उभारले जातील असे संकेत दिलेले आहेत. मुंबई येथे आयोजित उद्योग संवाद परिषदेनंतर मुख्यमंत्री महोदयांनी असे संकेत दिले आहेत.

यानुसार, आता इलेक्ट्रिक व्हेईकल उद्योग मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर येथे स्थापित होण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता गेल्या काही वर्षांमध्ये छत्रपती संभाजी नगरचा औद्योगिक विकास चांगला झाला आहे.

मागास समजला जाणारा मराठवाडा विभाग यामुळे विकसनशील बनला आहे. दरम्यान गेल्या वर्षापासून मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी इलेक्ट्रीक व्हेईकल उत्पादन करणाऱ्या मोठ्या कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे.

यापाठोपाठ अशा कंपन्यांच्या पुरवठादार लहान कंपन्याही इथे उद्याेग स्थापित करण्याचा निर्णय घेत आहेत. आता या शहरातील इलेक्ट्रिक व्हेईकल उद्योगांची संख्या मोठी झाली आहे. म्हणून छत्रपती संभाजीनगर शहर आता ईव्ही हब म्हणून उदयास येऊ लागले आहे, असं जाणकार लोकांचे म्हणणं आहे.

दुसरीकडे, आगामी काळात राज्यात जे ईव्ही उद्योग येतील ते उद्योग सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्येच स्थापित करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

या ठिकाणी  टोयोटा-किर्लोस्कर, जेएसडब्ल्यू, एथर एनर्जी यांसारख्या मोठ्या कंपनीचे उद्योग आलेले आहेत. हे मोठे ईव्ही उद्योग दाखल झाल्यामुळे या कंपन्यांसाठी पुरवठादार म्हणून काम करणाऱ्या एम्ब्रिको,

उनो मिंडासारख्या कंपन्या सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्याने दाखल झाल्यात आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी काळात जे इलेक्ट्रिक व्हेईकल उद्योग येतील ते छत्रपती संभाजी नगर मध्ये सुरू करण्याचे संकेत दिलेले आहेत आणि यामुळे साहजिकच हे शहर आता ईव्ही हब म्हणून ओळखले जाणार आहे. 

पुणे आणि नाशिकमध्ये या उद्योगांना अधिक प्राधान्य  

शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून ख्याती असणाऱ्या पुण्यात ऑटोमोबाइल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात आहेत आणि यामुळे तेथे ऑटोमोबाइल इंडस्ट्रीजला अधिक प्राधान्य दिले जाऊ शकते असे बोलले जाऊ लागले आहे. म्हणजेच राज्याच्या सांस्कृतिक राजधानीचे शहर आता ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजचे हब म्हणून ओळखले जाणार आहे.

तर दुसरीकडे वाईन सिटी म्हणून जगभर प्रसिद्ध असणाऱ्या नाशिक येथे एरोनॉटिकल इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात स्थापित झालेल्या आहेत आणि यामुळे तेथे डिफेन्स क्लस्टर विकसित केले जाईल अशी माहिती आता मीडिया रिपोर्टमधून समोर येऊ लागली आहे.

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली सारख्या जिल्ह्यांमध्ये स्टील इंडस्ट्रीला आवश्यक असणारा कच्चा माल उपलब्ध आहे आणि त्यामुळे या जिल्ह्यात स्टील उद्योग  अधिक बहरण्याची शक्यता आहे.

महत्त्वाची बाब अशी की विदर्भातील गडचिरोली येथे जीएसडब्ल्यू स्टीलने जगातील सर्वाधिक मोठा स्टील प्लांट उभारण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे. म्हणूनच आता विदर्भातील या जिल्ह्यांमध्ये स्टील उद्योगांना अधिक प्राधान्य दाखवले जाऊ शकते अशी शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!