महाराष्ट्र राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा ! राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीतील तीन महत्त्वाचे निर्णय जाणून घ्या

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आज तीन महत्त्वाचे निर्णय देण्यात आले आहेत. यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांसाठी देखील एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या याच निर्णयांची आज आपण माहिती पाहणार आहोत.

Published on -

Maharashtra News : आज 10 जून 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली असून या बैठकीत राज्यातील काही विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेण्यात आला आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे बैठक संपन्न झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते.

दरम्यान या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत आणि यातील एक महत्त्वाचा निर्णय राज्यातील विद्यार्थ्यांच्या संदर्भातील आहे. म्हणूनच आज आपण राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आलेले तीन महत्त्वाचे निर्णय नेमके कोणते आहेत याचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत.

विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला मोठा निर्णय

आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने सादर केलेल्या एका महत्त्वाच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

राज्यातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात दहा हजार रुपयांची वाढ करण्याचा मोठ्या निर्णय आज घेण्यात आला असून राज्यातील शासकीय भौतिकोपचार व व्यवसाय उपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्या वेतनात 6250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे बीएससी नर्सिंग च्या विद्यार्थ्यांना सुद्धा आता 8000 रुपये विद्या वेतन मिळणार आहे. विद्यार्थ्यांचं विद्यावेतन वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. खरेतर, आज पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 10 हजार रूपयांची वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

सोबतच बीएससी नर्सिंग आणि व्यवसायोपचार अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनाही वाढीव विद्यावेतन मिळणार आहे. दरम्यान या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील आणखी दोन महत्त्वाचे निर्णय कोणते

राज्यातील विद्यार्थ्यांचे विद्यावेतन वाढवण्या सोबतच राज्य मंत्रिमंडळाने आज आणखी दोन मोठे निर्णय घेतलेत. सामाजिक न्याय विभागाने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला असून आगामी विधिमंडळ अधिवेशनात विधेयक आणणणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैज्ञानिक दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला असल्याने संबंधितांच्या माध्यमातून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

या दोन निर्णयासोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून विविध प्रकारच्या दरांमध्ये सुधारणा केली जाणार आहे. हा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe