Maharashtra Railway : महाराष्ट्रातील 27 रेल्वे स्थानकांना जोडणारी एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार आहे. ही गाडी टेम्पररी राहणार आहे. मात्र या गाडीमुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांना थोड्या काळासाठी का होईना पण दिलासा मिळेल अशी आशा आहे. खरंतर पुढील महिन्यात आषाढी एकादशी आहे आणि याच आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारकऱ्यांचा मेळा भरतो.
दरम्यान जर तुम्हाला ही आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी जायचे असेल तर तुमच्यासाठी मध्य रेल्वे कडून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे कडून श्रीक्षेत्र पंढरपूर साठी नवीन विशेष गाडी चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने नागपूरहून पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा विचार करून नागपूर ते मिरज या मार्गावर विशेष गाडी चालवण्याची घोषणा केली असून ही गाडी एक जुलै ते 10 जुलै दरम्यान चालवली जाणार आहे. या काळात या गाडीच्या एकूण चार फेऱ्या होणार आहेत.
म्हणजेच नागपूर ते मिरज अशा दोन आणि मिरज ते नागपूर अशा दोन फेऱ्यांचे नियोजन आखण्यात आले आहे. दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक कसे राहणार याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
नव्या विशेष गाडीचे वेळापत्रक कसे असणार?
रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार नागपूर मिरज विशेष एक्सप्रेस ट्रेन चार आणि पाच जुलै 2025 रोजी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी नागपूर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी गाडी 11 वाजून पन्नास मिनिटांनी मिरज रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासात ही गाडी मिरज रेल्वे स्थानकावरून सहा आणि सात जुलै 2025 रोजी दुपारी सव्वा बारा वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी पहाटे 12:55 मिनिटांनी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
मात्र या गाडीचे तिकीट दर हे इतर सामान्य एक्सप्रेस गाड्यांपेक्षा थोडेसे अधिक राहू शकतात कारण की या गाड्या ट्रेन ऑन डिमांड या योजनेअंतर्गत चालवल्या जाणार आहेत.
नक्कीच एक जुलै ते 10 जुलै दरम्यान चालवल्या जाणाऱ्या या विशेष एक्सप्रेस ट्रेन मुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे. नागपूर ते मिरज या दोन फेऱ्यांमुळे आणि मिरज ते नागपूर या दोन फेऱ्यांमुळे या मार्गावरील प्रवाशांची श्रीक्षेत्र पंढरपूरला जाण्याची आणि परत माघारी फिरण्याची सोय होणार आहे.
कोण कोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबणार नवीन विशेष एक्सप्रेस
नागपूर ते मिरज दरम्यान चालवली जाणारी विशेष एक्सप्रेस ट्रेन राज्यातील तब्बल 27 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याची अधिकृत माहिती हाती आलेली आहे. अजनी, वर्धा, पुलगांव, धामणगाव, चांदुर, बडनेरा, मुर्तिजापुर, अकोला, शेगाव, मलकापूर,
भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव,जत रोड, ढालगाव, कवठे महाकाळ, सलगरे आणि अरग या रेल्वेस्थानकावर ही गाडी थांबा घेईल अशी माहिती रेल्वे कडून समोर आली आहे.
तथापि या गाडीच्या वेळापत्रकाबाबत आणि थांब्याबाबत अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देणे महत्त्वाचे राहणार आहे.