Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा मोठा निर्णय रेल्वे विभागाकडून घेण्यात आला आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.
ही गाडी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणार आहे. महाराष्ट्रातील पुणे आणि मध्यप्रदेशातील रिवा यादरम्यान ही नवीन गाडी चालवली जाईल.

या नव्या गाडीला आपल्या महाराष्ट्रातील तब्बल सहा महत्त्वाच्या स्थानकावर थांबा सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना या गाडीचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
कोणत्या मार्गावर धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन?
खरेतर, बालाघाटचे एमपी भारती पारधी यांनी बालाघाट वरून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू झाल्या पाहिजेत तशी मागणी केली होती. बालाघाटवरून नागपूर, पुण्याला जाणाऱ्या, येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे असा युक्तिवाद करत खासदार महोदयांनी बालाघाट वरून नवीन एक्सप्रेस चालवण्याची आग्रही मागणी उपस्थित केली.
दरम्यान प्रवाशांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या याच मागणीच्या पार्श्वभूमीवर आता रेल्वे बोर्डाकडून बालाघाट-पुणे रेल्वे मार्गावर एक नवीन रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे.
कस असणार वेळापत्रक?
मिळालेल्या माहितीनुसार 29 मे रोजी जारी केलेल्या रेल्वे बोर्डाच्या पत्रानुसार पश्चिम महाराष्ट्रातील पुण्याला नवीन एक्सप्रेस ट्रेन मिळणार आहे.
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी भारतातच 28 मे रोजी जारी केलेल्या रेल्वे बोर्डाच्या पत्र (सीसी -92)3/ 2025 नुसार, नवीन रीवा -पुणे साप्ताहिक एक्स्प्रेस चालवली जाणार आहे. त्यामुळे रीवा ते पुणे हा प्रवास सुपरफास्ट होईल अशी आशा आहे.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार नवीन एक्सप्रेस
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ही गाडी महाराष्ट्रातील सहा महत्त्वाच्या स्थानकावर थांबणार आहे. गोंदिया, नागपूर, वर्धा, भुसावळ, मनमाड, कोपरगावमार्गे ही ट्रेन सुरू केली जाणार आहे. नक्कीच या नव्या एक्सप्रेस ट्रेनमुळे पुण्यासहित उत्तर महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.