महाराष्ट्रातील Railway प्रवाशांचे नशीब उजळणार ! ‘या’ नवीन रेल्वे मार्गासाठी सरकारकडून 836 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर

राज्याला भविष्यात आणखी एका नव्या रेल्वे मार्गाची भेट मिळणार आहे. हा नवा रेल्वे मार्ग प्रकल्प मुंबई जवळ विकसित होईल. यामुळे मुंबई जवळील नागरिकांचा प्रवास वेगवान होणार आहे.

Published on -

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्राला लवकरच एका नव्या रेल्वे मार्गाची भेट मिळणार आहे. या नव्या रेल्वे मार्गामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई उपनगरातील कल्याण ते मुरबाड दरम्यान नवा रेल्वे मार्ग विकसित होणार आहे. दरम्यान आता हा नवा रेल्वेमार्ग मार्गी लागणार असल्याचे चित्र तयार होत आहे. कल्याण मुरबाड रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी केंद्राकडून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

त्यामुळे आत्तापर्यंत केवळ कागदावर दिसणारा हा प्रकल्प प्रत्यक्षात जमिनीवर साकारताना दिसणार आहे आणि यामुळे कल्याण ते मुरबाड हा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे. या प्रकल्पाला केंद्राकडून भरीव निधी उपलब्ध झाला असल्याने आज आपण या प्रकल्पाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा असणार नवा प्रकल्प ?

या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर या प्रकल्पासाठी केंद्राकडून 836.12 कोटी रुपयांची तरतूद करून देण्यात आली असल्याची माहिती संबंधितांकडून प्राप्त झाली आहे. याचा परिणाम म्हणून आता या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे.

या भरीव निधीमुळे कल्याण मुरबाड रेल्वे मार्ग प्रकल्पाचे काम आगामी का हात जलद गतीने पूर्ण होईल आणि प्रत्यक्षात कल्याण ते मुरबाड यादरम्यानचा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे.

या कल्याण मुरबाड नव्या रेल्वे मार्गाची सुरुवात ही कल्याणच्या आंबिवली स्टेशनपासून होणार आहे. आंबिवली स्टेशन पासून या मार्गाची सुरुवात होईल आणि पुढे हा मार्ग थेट मुरबाडपर्यंत तयार केला जाणार आहे.

या रेल्वे मार्गाची लांबी ही फक्त 28 किलोमीटर एवढीच आहे. मात्र या 28 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वेमार्ग प्रकल्पामुळे हजारो नागरिकांचा प्रवास सोयीचा होणार आहे. हा प्रकल्प या परिसरातील विकासाला चालना देणारा राहणार आहे.

खासदार म्हात्रे यांचा पाठपुरावा यशस्वी

हा प्रकल्प आत्तापर्यंत फक्त कागदावरच दिसत होता आणि कागदावरूनच या प्रकल्पाच्या फायद्याचे रंजक दृश्य आणि याचे फायदे सांगितले जात होते. मात्र आता या प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध झाला आहे. कारण म्हणजे या प्रकल्पासाठी खासदार सुरेश म्हात्रे यांनी जोरदार पाठपुरावा केला होता.

म्हात्रे यांनी संसदेत या प्रकल्पाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी आक्रमक भूमिका घेतली आणि अखेर कार केंद्राला या प्रकल्पाची दखल घ्यावी लागली आणि आता सरकारकडून यासाठी 836 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करून देण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी निधीची तरतूद करून देण्यात आली असल्याने आता प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीच्या संपादनाला वेग येणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe