Maharashtra School : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी तसेच शिक्षकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्यासाठी शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने अधिक महत्त्वाचा जीआर जारी केला आहे. या अंतर्गत आता पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचव्या ऐवजी इयत्ता चौथीसाठी तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी ऐवजी सातवीच्या वर्गांसाठी घेतली जाणार आहे.

खरे तर आधी चौथी आणि सातवीच्या वर्गासाठीच स्कॉलरशिप परीक्षा घेतली जात होती. शिष्यवृत्ती परीक्षा 1954 55 पासून आयोजित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी या अनुषंगाने ही योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचा प्रभाव फारच व्यापक राहिला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांसाठी फारच फायद्याची ठरले आहे. सुरुवातीला चौथी आणि सातवीच्या वर्गांसाठी स्कॉलरशिप परीक्षा आयोजित करण्यात येत होती. परंतु मध्यंतरी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप चेंज करण्यात आले.
ही परीक्षा पाचवी आणि आठवीच्या वर्गांसाठी लागू करण्यात आली मात्र या निर्णयाचा थोडासा नकारात्मक प्रभाव पाहायला मिळाला. 2016 17 पासून राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र हा निर्णय झाला आणि तेव्हापासून या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ लागली आणि म्हणूनच हा निर्णय फिरवला गेला पाहिजे अशी मागणी उपस्थित झाली. पूर्वीप्रमाणेच स्कॉलरशिप परीक्षा चौथी आणि सातवीच्या वर्गासाठी घेतली पाहिजे अशी मागणी विविध शैक्षणिक संघटनांकडून शिक्षकांकडून तसेच पालकांकडूनही उपस्थित होऊ लागली.
या अनुषंगाने राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून नुकत्याच काही महिन्यांपूर्वी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा एकदा चौथी आणि सातवीच्या वर्गांसाठी घेतली जाईल असे संकेत मिळाले होते. स्वतः शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा अशीच ग्वाही दिली होती.
दरम्यान यानुसार राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून आज अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे यावर्षी चौथी आणि सातवी सोबतच पाचवी आणि आठवी या वर्गांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. परंतु ही फक्त एक वेळची बाब राहणार आहे.
अर्थात यावर्षी चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा देता येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून फक्त चौथी आणि सातवीच्या वर्गासाठीच शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाईल.