महाराष्ट्रातील सर्वच शाळांच्या वेळापत्रकांमध्ये मोठा बदल ! कस असणार नवीन वेळापत्रक ?

पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुमच्याही कुटुंबातील कोणी पहिली ते दहावीच्या वर्गात शिकत असेल तर ही बातमी तुमच्याही कामाची राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नवीन शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे.

Published on -

Maharashtra Schools : येत्या 16 जून पासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 ची सुरुवात 16 जून 2025 पासून होणार आहे. महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशीम, आणि गडचिरोली हे 11 जिल्हे वगळता राज्यातील 25 जिल्ह्यांमधील शाळा 16 जून पासून सुरू होतील.

तसेच विदर्भातील जिल्ह्यांमधील शाळा 23 जून पासून सुरू होणार आहे. मात्र विदर्भातील शाळा या सुरुवातीला सकाळ-सत्रामध्ये भरवल्या जातील आणि त्यानंतर या शाळा नियमित भरतील. म्हणजेच आता राज्य बोर्डाच्या शाळा सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे.

अशी परिस्थिती असतानाच आता या नव्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांचे वेळापत्रक बदलणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. म्हणून आज आपण नव्या शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळांचे वेळापत्रक कसे असणार याचा आढावा घेणार आहोत.

कसे असणार राज्यातील शाळांचे वेळापत्रक?

मिळालेल्या माहितीनुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळा सकाळी नऊ वाजेला भरलेला आणि सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. राज्यातील शाळा आता सकाळी नऊ ते सायंकाळी चार पर्यंत राहतील.

शैक्षणिक वर्ष 2025 26 पासून सकाळी नऊ वाजेपासून ते 9:25 पर्यंत परिपाठ राहील. 9:25 पासून ते 11:25 पर्यंत सुरुवातीचे तीन लेक्चर्स होतील. 11:25 ते 11:35 पर्यंत दहा मिनिटांची लहान सुट्टी राहील. 11: 35 ते 12:50 पर्यंत दोन तासिका होतील.

12:50 ते दीड वाजेपर्यंत मोठी सुट्टी राहील. दीड वाजेपासून ते तीन वाजून 55 मिनिटांपर्यंत उर्वरित तासिका घेतल्या जाणार आहेत आणि शेवटचा पाच मिनिटात वंदे मातरम होईल आणि शाळा सुटणार आहे. सदरचे वेळापत्रक येत्या शैक्षणिक वर्षांपासून अमलात आणले जाईल अशी माहिती समोर येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News