महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दुसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी !

इयत्ता दुसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर राज्य बोर्डाच्या शाळांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यंदापासून होणार आहे. यानुसार इयत्ता पहिलीच्या वर्गाचा अभ्यासक्रम यावर्षी चेंज होणार आहे तर दुसरी ते बारावीचा अभ्यासक्रम कसा चेंज होणार याबाबतही मोठी माहिती समोर आली आहे.

Published on -

Maharashtra Schools : राज्य बोर्डाच्या दुसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे इयत्ता पहिली वर्गाचा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून बदलणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत बालभारतीने इयत्ता पहिली वर्गाच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार 47 लाख पुस्तकांची छपाई सुद्धा पूर्ण केली आहे. संबंधित विभागातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार त्रिभाषा सूत्रानुसार सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्यात आली असून,

राज्यातील इतर भाषिक विद्यार्थ्यांसाठी बालभारतीने सोप्या भाषेत मराठी पाठ्यपुस्तक छापण्याचे काम सुरू केले आहे. गुजराती, सिंधी, तेलुगू, तमीळ, उर्दू भाषिक विद्यार्थ्यांना मराठी सहजपणे समजावी यासाठी ‘मजेत शिकूया’ हे स्वतंत्र पुस्तक सुद्धा तयार करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील शाळा कधी सुरू होणार?

यंदाच्या शैक्षणिक वर्षातील शाळा 16 जून पासून सुरू होणार आहेत. 16 जून 2025 पासून 2025 – 26 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे. दरम्यान, येत्या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलणार आहे. शिवाय, यंदा पहिलीच्या विद्यार्थ्यांना वह्यांच्या पानाशिवाय पुस्तकं दिली जाणार आहेत.

नियमित अभ्यासक्रमासाठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतची पाठ्यपुस्तके शाळा सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांना मिळणार अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे. ‘खेळू-करू-शिकू’च्या ऐवजी शिक्षकांसाठी हस्तपुस्तिका तयार केली जात असल्याचे सांगितले गेले आहे.

मराठी व इंग्रजी माध्यमासाठी ‘खेल खेल में सिखे हिंदी’ हे पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. विशेष बाब अशी की, बालभारतीने पहिलीच्या पुस्तकांची छपाई पूर्ण करून ती तालुका गोदामांपर्यंत पोहोचवलेली आहेत. तसेच, अन्य भाषिक विद्यार्थ्यांसाठी मराठी पुस्तकांची छपाई सुरू करण्यात आली आहे.

दुसरी ते बारावीचा अभ्यासक्रम कसा चेंज होणार?

पहिलीचा अभ्यास क्रम यंदा बदलणार आहे तर दुसरी ते बारावीचा अभ्यासक्रम हा टप्प्याटप्प्याने बदलला जाईल. म्हणजेच सरसकट सर्वच वर्गाचा अभ्यासक्रम बदलणार नाही. आम्ही आपणास सांगू इच्छितो की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, इयत्ता दुसरी ते बारावीपर्यंत टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे.

पुढील वर्षाच्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच 2026-27 पासून दुसरी, तिसरी, चौथी व सहावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. दुसरीकडे आठवी दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम हा 2028-29 या शैक्षणिक वर्षापासून चेंज होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News