महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ तारखेपासून राज्यातील शाळा सुरू होणार, समोर आली मोठी अपडेट

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. खरेतर, CBSE बोर्डाची शाळा येत्या 9 जुनपासून सुरु होणार आहे. दरम्यान आता राज्य बोर्डाच्या शाळा कधीपासून सुरू होणार ? या संदर्भात नवीन माहिती हाती आली आहे.

Published on -

Maharashtra Schools : सध्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. मात्र पुढील महिन्यात विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या संपतील. अलीकडेच सीबीएसई बोर्डाकडून उन्हाळी सुट्ट्यांच्या संदर्भात मोठी माहिती जारी करण्यात आली होती.

सीबीएसई बोर्डाच्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुट्ट्या 8 जूनला समाप्त होतील आणि या शाळा 9 जून 2025 पासून सुरु होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा कधी सुरू होणार हा मोठा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान आता याच संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे.

केव्हा सुरू होणार राज्य बोर्डाच्या शाळा?

राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या पंधरा तारखेला समाप्त होणार आहेत. 15 जून 2025 रोजी विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या संपतील आणि 16 जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे.

नवीन शैक्षणिक वर्ष अर्थातच शैक्षणिक वर्ष 2025 26 ची सुरुवात 16 जून 2025 पासून होणार आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा कधी सुरू होणार हा सवाल उपस्थित केला जात होता.

अखेर कार आता राज्य बोर्डाच्या शाळा 16जुन पासून सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील शाळा 16 जून पासून नियमितपणे सुरू होणार नाहीत.

या विभागातील शाळा उशिराने सुरू होणार 

राज्यातील विदर्भ विभागातील म्हणजेच नागपूर आणि अमरावती या दोन विभागातील 11 जिल्ह्यांमधील शाळा थोड्या उशिराने सुरू होणार आहे आणि सुरुवातीच्या टप्प्यात विदर्भातील शाळा सकाळ सत्रात भरवल्या जाणार आहेत.

कारण म्हणजे तेथील तापमान वाढ. विदर्भात जून महिन्यात देखील मोठे तापमान पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने हा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.

दरम्यान, नवीन शैक्षणिक वर्षासाठी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक वर्गामध्ये अगदीच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतं आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळेच्या प्रांगणात परतण्यासाठी विद्यार्थी उत्सुक आहेत, तसेच त्यांनी शाळेची तयारी सुद्धा सुरु केली आहे.

नवीन वही स्कूल बॅग, पेन, पेन्सिल अशा वस्तूंची विद्यार्थ्यांकडून खरेदी सुरू झाली आहे. दुसरीकडे राज्यातील अनेक शाळांनी प्रवेशप्रक्रिया, पुस्तकांचे वाटप आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या योजनांचे काम पूर्ण केले असल्याची माहिती जाणकारांकडून समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News