महाराष्ट्रासहीत देशातील सर्वच बीएड कॉलेज बंद होणार ! राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय

तुम्हालाही Bed ला प्रवेश घ्यायचा आहे का मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरेतर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदकडून Bed कॉलेजच्या संदर्भात आणि बीएडच्या अभ्यासक्रमाच्या बाबतीत नुकताच मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

Published on -

Maharashtra Schools : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) ने बी.एड. कॉलेजच्या संदर्भात नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रासहित देशभरातील सर्वच बीएड कॉलेजवर परिणाम होईल अशी माहिती जाणकारांकडून समोर येत आहे.

खरंतर, एनसीटीईच्या माध्यमातून Bed च्या शिक्षण पद्धतीत ऐतिहासिक बदल घडवणारा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. दरम्यान आता आपण राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचा निर्णय नेमका काय आहे आणि याचा काय परिणाम होणार याचाच एक आढावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. 

परिषदेचा निर्णय काय 

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार, आता महाराष्ट्रात तसेच संपूर्ण देशात फक्त बी.एड. पदवी देणाऱ्या म्हणजे सिंगल डिग्री कॉलेजेसचे स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही. या कॉलेजेसना बहुविषयक पदवी (मल्टीडिसिप्लिनरी डिग्री) महाविद्यालयांमध्ये विलीनीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अर्थातच आता फक्त Bed महाविद्यालय आपल्याला दिसणार नाहीत. NCTE ने यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत या नव्या मार्गदर्शक तत्वांद्वारे असे स्पष्ट करण्यात आले आहे की, कोणतेही महाविद्यालय केवळ बी.एड. हीच पदवी देता कामा नये.

दरम्यान या अशा सिंगल डिग्री कॉलेजेसना 2030 पर्यंत इतर विषय शिकवणाऱ्या महाविद्यालयांमध्ये विलीन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजेच ज्या कॉलेजमध्ये फक्त डिग्रीचे शिक्षण दिले जाते आहे असे कॉलेज आता दुसऱ्या इतर विषय शिकवणाऱ्या महाविद्यालयांमध्ये विलीन होणार आहेत. तसेच 2030 पर्यंत यासाठी मुदत सुद्धा निश्चित करण्यात आली आहे.

बीएड कॉलेजला मिळणार नवीन संजीवनी 

या निर्णयामुळे बीएड कॉलेज बंद होणार असे नाही तर बी.एड. संस्थांना अन्य विषयांची पदवी देण्याचा अधिकार सुद्धा मिळणार आहे. प्रत्येकी 50 विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांत प्रवेश देता येणार आहे.

यामुळे जाणकार लोकांनी देशभरातील सुमारे 15 हजार बी.एड. महाविद्यालयांसाठी हा निर्णय फारच फायद्याचा राहील आणि त्यांच्यासाठी एक नवीन संजीवनी देण्याचे काम करेल असे सांगितले आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या काही वर्षांमध्ये बीएड कडे विद्यार्थ्यांचा कल लक्षणीय कमी झाला होता. यामुळे बीएड कॉलेजमधील पटसंख्या फारच झपाट्याने कमी होत चालली होती आणि अनेक महाविद्यालय यामुळे बंद होण्याच्या मार्गावर होती.

मात्र आता बहुविषयक अभ्यासक्रम उपलब्ध होणार असल्याने नक्कीच त्यांना नवसंजीवनी मिळणार असा विश्वास अनेकांच्या माध्यमातून यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.

बीएड अभ्यासक्रमातही झाला बदल 

फक्त Bed कॉलेज संदर्भातच परिषदेने निर्णय घेतलेला आहे असे नाही तर बीएडचा अभ्यासक्रम देखील बदलण्याचा मोठा निर्णय परिषदेकडून घेण्यात आला आहे. या नव्या निर्णयानुसार आता बीएडचा जो सुधारित अभ्यासक्रम राहील त्याला बारावीनंतरच प्रवेश घेता येणार आहे.

म्हणजेच आता देशभरातील विद्यार्थ्यांना 12वी नंतरच बी.एड. करणे शक्य होणार आहे. या निर्णयामुळे देशातील विद्यार्थ्यांना चार वर्षांचा बीए-बी.एड, बी.कॉम-बी.एड किंवा बी.एससी-बी.एड कार्यक्रमात प्रवेश घेता येणार अशी माहिती समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News