मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘या’ मार्गांवर सुरू होणार एसी बस सेवा, वाचा सविस्तर

मुंबईमधील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे मुंबईमधील काही मार्गांवर आता एसी बससेवा सुरू होणार आहे. या महत्त्वाच्या मार्गांमध्ये मुंबई ते ठाणे या मार्गाचा सुद्धा समावेश होतो हे विशेष. 

Published on -

Mumbai Bus Service : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई मधील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईवरून काही महत्त्वाच्या मार्गांवर आता एसी बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एक जून पासून बेस्टकडून तेरा महत्त्वाच्या मार्गांवर एसी बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. मुंबई ते ठाणे या मार्गावर देखील आता एसी बस सेवा सुरू होणार आहे.

बेस्ट कडून पहिल्यांदाच लांब पल्ल्याच्या मार्गावर एसी बस सेवा सुरू केली जात असून या बस सेवेला मुंबईकरांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद सुद्धा मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान आता आपण बेस्ट कडून कोणकोणत्या मार्गांवर एसी बस सेवा सुरू केली जाणार, मुंबई ते ठाणे या मार्गावर सुरू होणाऱ्या एसी बस सेवेचा रूट नेमका कसा असणार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ठाणे – मुंबई बससेवेचा रूट कसा असणार?

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई शहरातील मंत्रालयापासून ते ठाण्यातील बाळकुम पर्यंत बेस्ट कडून एसी बस सेवा सुरू केली जाणार आहे. या मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी एसी बस चालवली जाणार असून यामुळे मुंबई ते ठाणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.

काल 29 मे 2025 रोजी बेस्ट कडून या संदर्भातील घोषणा करण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मंत्रालय ते बाळकुम नवीन एसी बस A-490 ईस्टर्न फ्रीवे आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे मार्गे चालवली जाणार आहे.

या नव्या ऐसी बसच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर ठाण्यातील बाळकुम येथून ही गाडी सकाळी साडेसात वाजता आणि आठ वाजता मंत्रालयाच्या दिशेने रवाना होणार आहे.

तसेच परतीच्या प्रवासात ही गाडी मंत्रालयातून संध्याकाळी साडेपाच वाजता आणि सहा वाजता ठाण्याचा दिशेने रवाना होणार आहे. या गाडीचे तिकीट दर हे साधारणतः 50 ते 60 रुपयांच्या दरम्यान राहू शकते. म्हणजेच मुंबई ते ठाणे हा प्रवास अवघ्या साठ रुपयात गारेगार होईल असे आपण म्हणू शकतो.

खरे तर सकाळी आणि संध्याकाळी मुंबई ते ठाणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते आणि साहजिकच ही गाडी त्या गर्दीच्या कालावधीतच चालवण्याचे बेस्टचे नियोजन आहे आणि हे नियोजन मुंबई आणि ठाणेकरांसाठी एक परफेक्ट नियोजन राहणार आहे.

या मार्गांवर पण धावणार एसी बस

बेस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार एक जून 2025 पासून मंत्रालय ते शिवाजी नगर (A-8), काळाचौकी ते वरळी (44), वरळी डेपो ते वर्सोवा यारी रोड (56, फक्त रविवारी), नेव्ही नगर ते वरळी डेपो (125), आणि संताक्रूझ ते मालवणी (241,

आधी माहीम ते मालवणी डेपो), मालाड स्टेशन पश्चिम ते जनकल्याण नगर (243), गोरेगाव स्टेशन पूर्व ते फिल्म सिटी (343), गोरेगाव बस स्टेशन पूर्व ते संकल्प सोसायटी/नागरी निवारा प्रकल्प-४ (344), गोरेगाव बस स्टेशन पूर्व ते गोकुळधाम (347), गोरेगाव बस स्टेशन पूर्व ते मयूर नगर (452),

मुलुंड रेल्वे स्टेशन ते मालवणी डेपो (459), कांजूरमार्ग ते हिरानंदानी पवई (602), आणि मालाड स्टेशन पश्चिम ते भुजले तलाव (626) या मार्गांवर सुद्धा एसी बस सेवा सुरू होणार आहे. यामुळे या संबंधित मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता गारेगार प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!