Mumbai Expressway News : येत्या पाच तारखेला महाराष्ट्राला एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. 5 जून 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण होईल अशी बातमी समोर आली आहे.
नागपूर ते मुंबई दरम्यान राज्य रस्ते विकास महामंडळाकडून समृद्धी महामार्ग विकसित केला जात असून हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे. आतापर्यंत नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला आहे.

डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपुर ते शिर्डी हा 520km लांबीचा तपास सुरू करण्यात आला होता यानंतर 2023 मध्ये या महामार्गाचा शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू करण्यात आला पुढे 2024 मध्ये भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला आणि आता या महामार्गाचा शेवटचा टप्पा म्हणजेच इगतपुरी ते आमने हा शहात्तर किलोमीटर लांबीचा टप्पा सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला केला जाणारा आहे.
पाच तारखेला या टप्प्याचे लोकार्पण होणार असून यामुळे मुंबई ते नाशिक आणि मुंबई ते नागपूर हा संपूर्ण प्रवास वेगवान होणार आहे. अशी सगळी परिस्थिती असतानाच मुंबई ते कोकण या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक गुण न्यूज समोर आली आहे ती म्हणजे भविष्यात मुंबई ते कोकण हा प्रवास फक्त चार तासात पूर्ण होणार आहे.
राजधानी मुंबई ते कोकणातील सिंधुदुर्ग या दरम्यानचा प्रवास अवघ्या चार तासात होणार असून यासाठी नवीन महामार्ग विकसित होणार आहे. मुंबई ते कोकण दरम्यान सागरी महामार्गाची उभारणी केली जाणार आहे. दरम्यान याच संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी येथे मोठी माहिती दिली.
कसा असणार नवा प्रकल्प ?
सिंधुदुर्ग ते मुंबई यादरम्यान नवीन मार्ग विकसित होणार आहे. या प्रकल्पा अंतर्गत चार मोठ्या खाडी पूलांची निर्मिती केली जाणार आहे. हा एक ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे राहणार असून याची लांबी 376 किलोमीटर एवढी राहील.
मिळालेल्या माहितीनुसार या ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे मध्ये 41 बोगदे, 51 मोठे ब्रीज आणि 68 ओव्हरपास विकसित केले जाणार आहेत. मुंबई ते कोकण दरम्यान विकसित होणाऱ्या या ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे प्रोजेक्टसाठी जवळपास 68 हजार 720 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे.
या प्रस्तावित करण्यात आलेल्या ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे प्रोजेक्टमुळे नक्कीच राजधानी मुंबई ते कोंकण हा प्रवास वेगवान होईल अशी आशा जाणकारांकडून व्यक्त होत आहे. हा एक सहा पदरी महामार्ग राहणार आहे आणि याची रुंदी 100 मीटरची राहील. या प्रकल्पासाठी 3792 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार असल्याची ही माहिती देण्यात आली आहे.
कसा असणार रूट ?
मिळालेल्या माहितीनुसार या नव्याने प्रस्तावित प्रकल्प अंतर्गत सागरी महामार्ग, मुंबई गोवा महामार्ग आणि हायस्पीड ग्रीनफिल्ड महामार्ग हे एकमेकांना जोडले जाणार आहेत. अलिबाग- शहाबाद- रोहा, माणगाव- मेढेगाव, मंडणगड- दापोली- गुहागर शहर- गणपतीपुळे,
राजापूर-भालवली-देवगड शहर, मालवण-कुडाळ-सावंतवाडी अशा मार्गावरून हा नवा महामार्ग जाणार आहे आणि या नव्या प्रोजेक्टमुळे मुंबई ते कोकण या दरम्यानचा प्रवास वेगवान होणार असून कोकणातील चाकरमान्यांना या प्रकल्पाचा मोठा फायदा होईल अशी आशा आहे.