मुंबई ते खानदेश दरम्यानचा प्रवास होणार सुपरफास्ट ! तयार होणार नवा मार्ग, सरकारचा मास्टर प्लॅन काय सांगतो ?

देवेंद्र फडणवीस सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी खानदेशहुन मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे खानदेश मधील जळगाव ते मुंबई या दरम्यानचा प्रवास अवघ्या पाच तासांमध्ये शक्य आहे. 

Published on -

Mumbai Jalgaon Highway : मुंबई ते खानदेश दरम्यान चा प्रवास भविष्यात वेगवान होणार आहे या अनुषंगाने सरकारकडून आवश्यक ती कारवाई सुद्धा सुरू झाली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला केला आहे.

समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे मुख्यमंत्री महोदयांनी लोकार्पण केले. म्हणजेच आता समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे आणि या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हा संपूर्ण प्रवास अवघ्या आठ ते दहा तासांमध्ये शक्य होणार आहे.

दुसरीकडे आता याच समृद्धी महामार्गाला खानदेशातील एका महत्त्वाच्या जिल्ह्याला जोडले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार खानदेशी रत्न जळगाव जिल्हा आता समृद्धी महामार्गाला जोडला जाईल.

याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांच्या उपस्थितीत नागपूर येथे नुकत्याच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या बैठकीत झाला आहे.

जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या प्रवासाला गती देतानाच, जळगावहून समृद्धी महामार्गावरून मुंबईला फक्त पाच तासात कसे पोहोचता येईल, त्यादृष्टीने या सदरील बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

मुंबई – जळगाव प्रवास फक्त 5 तासात

खरे तर जळगाव ते मुंबई या दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. याशिवाय जळगाव होऊन संभाजीनगरला भेट देणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.

पण, सध्या जळगाव येथील नागरिकांना जर छत्रपती संभाजी नगरला जायचे असेल तर अजिंठा, सिल्लोडमार्गे जावे लागते. मात्र या मार्गाने संभाजीनगरला जायचे झाल्यास जळगावकरांना साधारणता अडीच तासांचा वेळ लागतो.

म्हणून जर हा रस्ता समृद्धी महामार्गाशी जोडला गेला तर जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवास अवघ्या एका तासावर आणता येईल असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त केला जातोय. महत्त्वाची बाब म्हणजे सध्या स्थितीला समृद्धी महामार्गावरूनच छत्रपती संभाजीनगर ते मुंबई यादरम्यानचा प्रवास अवघ्या चार तासांमध्ये शक्य आहे.

म्हणजेच जर जळगाव ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यानचा प्रवास वेगवान झाला तर म्हणजेच जळगाव जिल्ह्याला समृद्धी महामार्ग सोबत जोडले गेले तर भविष्यात जळगाव ते मुंबई हा प्रवास अवघ्या पाच तासांवर येणार आहे.

सध्या स्थितीला जळगावहून जर मुंबईला जायचे असेल तर धुळे नाशिक मार्गे जावे लागते आणि या प्रवासासाठी प्रवाशांना आठ तासांचा वेळ लागतो. पण जर जळगाव जिल्हा समृद्धी सोबत जोडला गेला तर समृद्धी महामार्गाने जळगावकरांना अवघ्या पाच तासात मुंबईला पोहोचता येईल म्हणजेच त्यांचा तीन तासांचा वेळ वाचणार आहे.

नक्कीच ही गोष्ट जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी किंबहुना संपूर्ण खानदेश विभागाच्या विकासासाठी महत्वाची राहणार आहे. एवढेच नाही तर 2600 कोटी रुपये खर्च करून चाळीसगाव ते कन्नड यादरम्यानच्या औट्रम घाटात 12.75 किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्याचा देखील निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे.

यामुळे कन्नड घाटातील वाहतूक कोंडी आगामी काळात पूर्णपणे दूर होणार आहे. यामुळे चाळीसगावहुन छत्रपती संभाजी नगरला जाणे जलद होईल. या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन्ही विभागातील कनेक्टिव्हिटी आणखी सदृढ होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!