Mumbai Metro News : देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये लोकल ट्रेन ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. यामुळे लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. लोकल ट्रेन ने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची संख्या ही लाखोंच्या घरात आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर या परिसरातून देखील अनेक जण लोकलने प्रवास करतात. मात्र या परिसरातील प्रवाशांना लोकल प्रवासादरम्यान मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

लोकलमध्ये होणारी प्रचंड गर्दी प्रवाशांचा मनस्ताप वाढवते. मात्र लोकलच्या गर्दीपासून आणि रेटारेटी पासून आता लवकरच या परिसरातील नागरिकांना मुक्ती मिळणार आहे.
कारण की हा परिसर आता मेट्रोच्या नकाशावर येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई मेट्रो आता थेट बदलापूर पर्यंत धावणार असून यामुळे या परिसरातील विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान आता आपण बदलापूर पर्यंत प्रस्तावित करण्यात आलेला मेट्रो मार्ग नेमका कसा राहील, या मार्गावर किती स्थानके विकसित होतील? याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार नवा मेट्रो मार्ग ?
या प्रस्तावित करण्यात आलेल्या मेट्रो मार्गाच्या रूट बाबत बोलायचं झालं तर हा मेट्रो मार्ग कांजूरमार्ग ते बदलापूर पर्यंत राहणार आहे. या मार्गाला मेट्रो मार्ग 14 असे नाव देण्यात आले आहे.
हा मेट्रो मार्ग 38 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. दरम्यान आता मेट्रो मार्ग 14 प्रकल्पाच्या बाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
हा प्रकल्प कागदावर न राहता आता तो प्रत्यक्षात तयार सुद्धा होणार आहे. कारण की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या महिन्याच्या शेवटी या मेट्रोमार्ग प्रकल्पासाठी टेंडर काढले जाणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.
हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजेच सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर विकसित केला जाणार असून सुरुवातीला पीपीपी तत्त्वावर या प्रकल्पाचे काम करू इच्छिणाऱ्या कंपन्यांकडून टेंडर मागवले जाणार आहे.
नव्या मेट्रो मार्गावर किती स्थानके विकसित होणार?
कांजूरमार्ग – बदलापूर मेट्रोमार्ग 38 किलोमीटर लांबीचा राहिल आणि यावर 15 मेट्रो स्थानके तयार होणार अशी माहिती संबंधितांकडून प्राप्त झाली आहे. या मेट्रो मार्गाचा रूट कांजूरमार्ग – घणसोली – महापे – अंबरनाथ – बदलापूर असा प्रस्तावित करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब अशी की घनसोली पर्यंत हा मेट्रो मार्ग अंडरग्राउंड म्हणजेच भूमिगत राहणार आहे.
ठाण्याच्या खाडी खालून हा मार्ग जाईल. मात्र पुढे घनसोली ते बदलापूर पर्यंत हा मेट्रो मार्ग उन्नत राहणार आहे. या मेट्रो मार्गाचा जवळपास साडेचार किलोमीटर लांबीचा मार्ग पारसिक हिलमधून जाईल. हा प्रकल्प जवळपास 18 हजार कोटी रुपयांचा आहे.