सध्या महाराष्ट्राची राजधानी व उपराजधानी या दोन शहरांमध्ये सुरु होणाऱ्या वंदे भारत ट्रेनबाबत चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. तब्बल 160 किलोमिटर प्रतितास वेगाने चालणाऱ्या या ट्रेनची सर्वांनाच उत्सुकता आहे. या ट्रेनमुळे या दोन्ही शहरांतील प्रवासाच वेळ तब्बल 6-7 तासांनी वाचणार आहे. ज्या प्रवासाला पूर्वी 14 ते 20 तास लागत होते, तोच प्रवास आता फक्त 8 ते 9 तासांत होणार आहे.
काय आहे अपडेट?
मुंबई ते नागपूर या दोन शहरांत वंदे भारत ट्रेन सुरु होणार आहे. या ट्रेनमुळे वेळेची बचत होणार असून, लवकरच ती सुरु होणार आहे. मुंबईहून नागपूरला पोहोचण्यासाठी एक्स्प्रेस ट्रेनने 14 ते 20 तास लागत होते. ते अंतर आता नऊ तासांत पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे जवळपास पाच ते सहा तासांच्या वेळेची बचत होणार आहे. मुंबई- नागपूर या प्रवासात प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वेने या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर ते मुंबई यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल. 160 किमी प्रतितास वेगाने धावणारी वंदे भारत सीएसएमटी ते नागपूर या प्रवासादरम्यान 8 स्थानकावर थांबेल.

कुठे-कुठे थांबणार?
वंदे भारत एक्सप्रेस ही वर्धा, भंडारा, अकोला, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण आणि दादर या स्थानकावर थांबणार आहे. काही दिवसांतच नागपूर ते मुंबई या रेल्वे मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेनही धावण्याची शक्यता आहे. या मार्गावर चाचपणी सुरू आहे. ही ट्रेन तब्बल आठ स्थानकाव थांबणार असल्याने या रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळेल, असे सांगितले जात आहे.
किती असेल तिकीट?
वंदे भारत ट्रेनचे तिकीट 1500 ते 3500 हजारांपर्यंत असणार आहे. त्यातच 1500 ते 2000 एसी चेअर कारचे तिकिट असेल, अशीही माहिती दिली गेली आहे. मुंबई ते नागपूर यादरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला 8 बोगी असतील. यामध्ये एक बोगी एक्झिक्युटीव्ह एसी असेल तर सात बोगी या एसी चेअर कार असतील. यामार्गावर प्रवासाला 9 ते 10 तास लागतील.
एसी बोगीचे तिकिट किती?
मुंबई ते नागपूर यादरम्यान एसी चेअर कारचे तिकिट अंदाजे 1500 ते 2000 रूपये इतके असेल. तर एक्झिक्युटीव्ह एसी बोगीचे तिकिट 2500 ते 3500 रूपये इतके आहे. तिकिटाच्या किंमतीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र ही ट्रेन लवकरच सुरु होईल असे सांगितले जात आहे.