Mumbai Railway : वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या गाडीचा विस्तार करण्यात आला आहे.
आता ही गाडी सीएसएमटी ते जालना दरम्यान धावणार नसून थेट नांदेड पर्यंत धावणार आहे. यामुळे मराठवाड्यातील आणखी काही जिल्हे वंदे भारत एक्सप्रेस ने कनेक्ट होणार आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळे मुंबई ते नांदेड हा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे.

या नव्या निर्णयामुळे परभणी आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पण हा निर्णय छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी थोडासा गैरसोयीचा ठरेल अशीही ओरड केली जात आहे.
सीएसएमटी जालना वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आता थेट नांदेड पर्यंत चालवली जाणार आहे आणि यामुळे सहाजिकच या गाडीच्या वेळापत्रकात सुद्धा बदल झालेला आहे. दरम्यान आता आपण या गाडीचे नवीन वेळापत्रक नेमके कसे आहे याचाच आढावा या ठिकाणी घेणार आहोत.
कसे आहे नवं वेळापत्रक
मीडिया रिपोर्टनुसार आता हि वंदे भारत एक्सप्रेस नांदेड येथून सकाळी पाच वाजता सोडले जाणार आहे. नांदेड येथून सुटल्यानंतर पाच वाजून 40 मिनिटांनी ही गाडी परभणीत पोहोचेल पुढे सात वाजून वीस मिनिटांनी ही गाडी जालनाला पोहोचलं आणि मग आठ वाजून तेरा मिनिटांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी हे गाडी राजधानी मुंबईत पोहोचणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की आधी पावणेसहा वाजता ही गाडी छत्रपती संभाजी नगर मध्ये पोहोचत असे. म्हणजेच नांदेड पर्यंत या गाडीचा विस्तार झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये ही गाडी पोहोचण्यास उशीर होणार आहे.
परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर परतीच्या प्रवासाच्या वेळेत बदल झालेला नाही. राजधानी मुंबईतून ही गाडी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी सोडली जाणार आहे, मग छत्रपती संभाजी नगरला ही गाडी सात वाजून पाच मिनिटांनी पोहोचणार आहे,
पुढे जालन्याला आठ वाजून पाच मिनिटांनी, परभणीला नऊ वाजून 43 मिनिटांनी आणि नांदेडला ही गाडी दहा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचणार आहे. दरम्यान हे नवं वेळापत्रक लवकरच लागू होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून समोर येत आहे.
या रेल्वे स्टेशनवर अतिरिक्त थांबा मंजूर
सीएसएमटी – जालना दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस आतापर्यंत दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड अंकाई, छत्रपती संभाजीनगर, जालना या रेल्वे स्टेशनवर थांबा घेत असे. पण आता ही गाडी परभणी मार्गे नांदेड पर्यंत चालवली जाणार आहे आणि या गाडीला परभणी रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.