Post Office Scheme : गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होत आहे. सप्टेंबर 2024 पासून शेअर मार्केट दबावात आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याने मार्केटमध्ये दबाव दिसतोय.
यामुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हेच कारण आहे की, सुरक्षित गुंतवणुकीची योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण अलीकडे अचानक वाढले आहे.

सुरक्षित गुंतवणुकीसाठी भारतात आजही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दाखवले जाते. काही लोक बँकांच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करतात.
दरम्यान जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेची माहिती पाहणार आहोत.
या योजनेत दरमहा 10 हजाराची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना किती रिटर्न मिळणार ? याबाबत आता आपण माहिती जाणून घेणार आहोत.
कशी आहे पोस्ट ऑफिसची आरडी योजना?
आरटीओ योजनेमध्ये गुंतवणूकदारांना प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करावी लागते. या आरडी योजनेत जमा रकमेवर पोस्ट ऑफिस कडून एका ठराविक व्याजदरानुसार व्याज दिले जाते.
सध्या पोस्ट ऑफिस कडून आरडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 6.7 टक्के दराने व्याज दिले जात आहे. पोस्ट ऑफिसच्या या स्कीम मध्ये गुंतवणूकदारांना किमान शंभर रुपयांची गुंतवणूक करता येते.
म्हणजेच महिन्याला किमान शंभर रुपयांच्या गुंतवणुकीचा पर्याय गुंतवणूकदारांना उपलब्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे यात कमाल गुंतवणुकीची कोणतीच मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. गुंतवणूकदाराला त्याला हवी तेवढी रक्कम या योजनेत गुंतवता येते.
प्रत्येक महिन्याला दहा हजाराची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार
पोस्टाची आरडी योजना पाच वर्षांची आहे. पोस्टाच्या आरडी योजनेत सध्या 6.7 टक्के दराने व्याज दिले जात असून जर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत धर्मा दहा हजार रुपयाची गुंतवणूक सुरू केली तर त्याला मॅच्युरिटी वर म्हणजेच पाच वर्षांनी सात लाख 13 हजार 659 रुपये मिळणार आहेत.
यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक सहा लाख रुपयांची राहणार आहे आणि उर्वरित एक लाख 13 हजार 659 रुपये त्याला व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत.
पोस्टाची आरडी योजना अशा लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे ज्यांना एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवता येणे शक्य नाही. या योजनेत दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवून देखील मोठा फंड तयार करता येतो.