पुणे – सोलापूर हायवे वरील वाहतूक कोंडी फुटणार ! ‘या’ प्रकल्पाला मंजुरी

पुणे ते सोलापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. ते म्हणजे या महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एका भव्य प्रकल्पांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. 

Published on -

Pune News : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी आता दूर होणार आहे. ट्रॅफिक जॅम दूर करण्यासाठी आता ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर ते यवतदरम्यान सहामार्गी उड्डाणपुलाला मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने हडपसर ते यवत दरम्यान 5 हजार 262 कोटी रुपये खर्चाच्या भव्य प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.

यामुळे पुणे – सोलापूर नॅशनल हायवे वरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. दरम्यान आता आपण याचबाबत माहिती जाणून घेणार आहोत. 

काय आहेत डिटेल्स ? 

हडपसर ते यवत दरम्यान सहा पदरी उड्डाणपूल तयार केला जाणार असून या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. हा निर्णय सोमवारी घेण्यात आला आहे.

महत्वाची बाब म्हणजे या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (MSRDC) सोपवण्यात आली आहे. हा प्रकल्प बीओटी (Build-Operate-Transfer) म्हणजे बांधा वापरा आणि हस्तातर करा या तत्त्वावर राबवण्यात येणार  आहे.

दरम्यान हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांकडून टोल आकारला जाणार अशी माहिती देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे तीन वर्षांच्या आत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सुद्धा ठेवण्यात आले आहे.

पुणे – सोलापूर हायवे 6 पदरी बनवला जाणार 

खरेतर, पुणे सोलापूर महामार्गांवर हडपसरच्या पुढे मांजरी फाटा, लोणी काळभोर, उरळी कांचन या प्रमुख ठिकाणी नेहमीच मोठी वाहतूक कोंडी जाणवत असते. खरेतर उरळी कांचनजवळील शिंडेवणे घाटातून उतरणाऱ्या वाहनांमुळे या भागात सर्वात जास्त कोंडी आणखी वाढत असते.

दरम्यान आता हा प्रस्तावित उड्डाणपूल यवतपर्यंत नेण्यात येणार असल्याने या सर्व ठिकाणी वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता जाणकार लोकांनी वर्तवली आहे.

एवढेच नाही तर या पुलासोबतच सध्याचा पुणे-सोलापूर महामार्ग सहा पदरी केला जाणार अशी माहिती देण्यात आली आहे. म्हणजे या भागात जमीन व उड्डाणपूल मिळून एकूण 12 मार्गिकांचा वाहतूक प्रवाह निर्माण होणार आहे ट्रॅफिकची समस्या नक्कीच दूर होणार आहे.

तसेच जमिनीच्या अधिग्रहणासाठी संबंधित बाधित शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई सुद्धा दिली जाणार आहे. आता यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया व प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News