UPSC Interview Questions: माणसानंतर सर्वात बुद्धिमान प्राणी कोणाला मानले जाते? जाणून घ्या UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- अनेक उमेदवार वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. असे असूनही परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल, तर तुमची तयारीही त्याच लेव्हलची असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्क क्षमता तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.(UPSC Interview Questions)

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न: अशी कोणती गोष्ट आहे जी पाणी प्यायल्यानंतर मरते?
उत्तर: तहान

प्रश्न: मनुष्यानंतर सर्वात बुद्धिमान प्राणी कोणाला मानला जातो?
उत्तर: डॉल्फिन

प्रश्न: असे फळ जे बाजारात उपलब्ध नाही?
उत्तर: मेहनतीचे फळ

प्रश्न: लहानपणापासून वृद्धापकाळापर्यंत शरीराचा कोणता भाग वाढत नाही?
उत्तर: डोळे

प्रश्न:असा देश जिथे फक्त 40 मिनिटे रात्र असते?
उत्तर: नॉर्वे

प्रश्न: एक भिंत बांधायला आठ माणसांना 10 तास लागले तर चार माणसांना ती बांधायला किती वेळ लागेल?
उत्तर: अजिबात वेळ नाही, कारण ती आधीच बांधलेली आहे.

प्रश्न: जगातील एकमेव हिंदू राष्ट्र कोणते?
उत्तर: नेपाळ

प्रश्न: असे काय आहे की जेवढे जवळ जाल तेवढे कमी दिसेल?
उत्तर: अंधार

प्रश्न: आंबट मध कुठे मिळतो?
उत्तर: ब्राझील

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe