Ration Card News : रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि अगदीच कामाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील रेशन कार्डधारकांना जून महिन्यात पुढील तीन महिन्यांचे रेशन दिले जाणार आहेत. म्हणजेच पुढील जून महिन्यात जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे रेशन मिळणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य शासनाने आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अन्नधान्य सुरक्षेचा विचार करून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

शिधापत्रिकाधारकांना जूनमध्येच पुढील तीन महिन्यांचे म्हणजेच ऑगस्टपर्यंतचे धान्य दिले जाणार आहे. म्हणजेच रेशन कार्ड धारकांना एकाच वेळी तीन महिन्यांचा लाभ देण्यात येणार आहे.
त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी ही बातमी नक्कीच दिलासा दही राहणार असेल. महत्त्वाची बाब अशी की, या धान्याची गोदामांमधून उचल 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारनेही दिलेत महत्वाचे निर्देश
केंद्रातील मोदी सरकारने सुद्धा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत धान्य वितरणाबाबत राज्य सरकारांना मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत.
केंद्रातील सरकारकडून जारी करण्यात आलेल्या या मार्गदर्शक सूचनामध्ये ऑगस्टपर्यंतचे धान्य 30 जूनपर्यंत वितरित करण्यासाठी राज्य सरकारला सुसंगत पावले उचलण्यास सांगितले गेले आहे आणि या अनुषंगाने संबंधितांकडून योग्य ती कारवाई केली जात आहे.
दरम्यान राज्यातील सर्वच जिल्ह्यांना रेशनच्या उचल प्रक्रियेची गती वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. रेशनची उचल करण्यासाठी अधिकाधिक वाहने वापरण्याचे सुचवण्यात आले आहे.
या आदेशामध्ये शनिवार आणि रविवारसारख्या सुटीच्या दिवशीही उचल करण्याचे सुचवण्यात आले आहे. सुट्टीच्या दिवशी ची उचल संबंधित अधिकाऱ्यांना एक दिवस आधी कळवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आले आहेत.
यावेळी पुरवठा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून रेशन कार्डधारकांना जून महिन्यात जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे रेशन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.